Marathi goshti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi goshti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Bal goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Bal goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Stories for kids in marathi
Bal Goshti

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Bal goshtiलहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. lahan mulanchya goshti व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे Bal goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 6 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Bal goshti छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


खरा न्याय:- Bal goshti [ छान छान गोष्टी ]


           एका गावात  राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.

          शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो

            शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.

         राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला  योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.


तात्पर्य -खरा न्याय करावा.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi & marathi stories with moral values
         
              MARATHI STORY 2


लालची कुत्रा :- Bal goshti लहान मुलांचे गोष्टी


         एका गावात एक दुकानदार मटण विकण्याचा व्यवसाय करत असतो. दुकानात काही लोक काम करत असतात आणि कोपऱ्यात एक कुत्राही बसलेलं असते. एकदा दुकानदार मटण कापतो तेव्हा काही तुकडे खाली जमिनीवर पडतात. कुत्रा ते तुकडे पाहतो. थोडाही वेळ न लावता कुत्रा तो तुकडा उचलतो आणि तेथून धूम ठोकतो.

          कुत्रा तो तुकडा घेऊन खाण्यासाठी जागा शोधत असतो तिथे त्याला तो तुकडा शांतपणे चघळत खायचा असतो. एवढ्यात त्याला त्याची सर्वात आवडती नदीपलीकडील जागा आठवते आणि तो तिकडे पळू लागतो. नदी ओलांडताना तो पाण्यात डोकाऊन पाहतो तर त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसते पण त्याला वाटते तो कुणी दुसरा कुत्रा आहे.

           त्याच्याकडील मटणाचा तुकडा आपण घेऊ कारण तो पण त्यालाच पाहिजे असतो आणि तो त्याच्यावर भुंकू लागतो. त्याचा मटणाचा तुकडा पाण्यात पडतो आणि कुत्रा मटणाचा तुकडा गमावतो.



तात्पर्य -जेवढ मिळाले तेवढ्यात सामाथान मानव जास्त गोष्टीचा हव्यास करू नये .

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3


संगत:- Chan Chan goshti ] marathi stories for childrens


एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!


तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

              Marathi story 4


हुशार  हत्ती :- [ लहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi ]



            एकदा एका गावामध्ये एक हुशार माणूस राहत असतो. ते गाव खूपच लहान असते. गावात थोडीच घरे असतात. तो माणूस सर्वांना चांगली जीवनमूल्ये शिकवीत असतो तसेच चांगले मार्गदर्शन करीत असे. त्यामुळे आता गावातल्या लोकांमध्ये खूप चांगले बदल होतात. कोणाचीच कोणाशी भांडणे होत नाहीत. अशाप्रकारे गाव तंटामुक्त होते.

             गाव तंटामुक्त झाल्यामुळे गावाचा प्रमुख मात्र नाराज होतो. कारण आता गावात कोणाचीच तक्रार नाही. त्यामुळे त्याला पैसे मिळत नाही. त्याअगोदर त्याला या सर्व गोष्टीमुळे पैसे मिळत असत. आपल्याला परत पैसे मिळू लागावेत म्हणून त्या माणसाचा बदला घेण्याचा विचार करून तो राजाकडे जातो. दरबारात सांगतो कि, काही गावकऱ्यांच्या घरात चोरी झाली आहे. राजा लगेचच सैनिकांना चोरांना पकडायला सांगतो आणि जो चोर असेल त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचे आदेश देतो.

          राजाचे सैनिक गावातील सर्व प्रमुख व्यक्तींना आणि त्या सदगृहस्थाला चोर म्हणून पकडून आणतात. जेव्हा त्यांना हत्तीकडे घेऊन जातात. तेव्हा हत्ती त्यांना चिरडत नाही. राजा आश्चर्यचकित होतो.

           मग तो सदगृहस्थ राजाला सांगतो आम्ही काहीही  चूक केलेली नाहीये. आमचे मन पवित्र आहे. आम्ही कोणालाही इजा केलेली नाही. हाच आमचा सदगुण हत्तीने जाणला. त्यांनी आम्हाला शिक्षा केली नाही. त्या शहाण्या माणसाने राजाला खरा प्रकार सांगितल्यावर राजाने गावप्रमुखास शिक्षा केली. 



तात्पर्य - करावे तसे भरावे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

              Marathi story 5


गेलेला ऋतूच बरा:- [ लहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi ]


 हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला. लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.


तात्पर्य : कुठलेही कसेही दिवस आले तरी अतृप्त मनाच्या माणसांचे कधीही समाधान होत नाही.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || Marathi bodh katha

              Marathi story 6


एका तांदळाची खीर:- [ Stories for kids in marathi || Chan Chan goshti ]


एकदा गणपतीने एका लहान बालकाचे रूप घेतले. बालकाच्या एका हातात एक चमचा भरून दूध होते आणि दुसऱ्या हातात एक तांदूळ होता. तो बालक प्रत्येक घरात जाऊन म्हणत होता, “कोणीतरी माझ्यासाठी खीर बनवून द्या.” बालकाच्या हातातील एक चमचा दूध व एक तांदूळ बघून घरातील बायका त्याला खूप हसत असे. त्या त्याला म्हणत, “एवढयामध्ये काय खीर होणार?”

तो बालक जेव्हा जास्त हट्ट करत तेव्हा त्या काही तरी कारण काढून त्याला टाळत किंवा काहीजणी चिडून त्याला घरातून हाकलून देत. सकाळची संध्याकाळ झाली परंतु बालकासाठी खीर बनवायला कोणीही तयार नव्हते.

संध्याकाळी बालक एका झोपडीसारख्या घरात गेला. तेथे एक वृध्द महिला रहात होती. बालक त्या महिलेला विनवणी करून म्हणाला, “आई, माझ्यासाठी खीर बनवून दे. मी प्रत्येक घराघरात फिरून आलो. माझ्याजवळ तांदूळ आहे व दूध पण आहे. पण मला कळत नाही की खीर बनवायला अशी किती मेहनत लागते की सर्व सामान देऊनही मला कोणी खीर बनवून देत नाही!”

तेव्हा त्या वृध्देने बालकाला प्रेमाने जवळ घेतले व ती म्हणाली, “अरे माझ्या लाडक्या, दे मी तुझ्यासाठी खीर बनवून देते.”

त्या वृध्देने लगेच आपल्या सुनेला सांगितले, “मला एक छोटी कढई आणून दे खीर बनवाण्यासाठी.”

ते ऐकून बालकाने आता नवीन हट्ट सुरू केला तो हा की, घरात जी सर्वात मोठी कढई असेल त्यातच खीर बनवायची. त्या वृध्द महिलेने बालकाचे तेही म्हणणे मान्य केले व ती खीर बनविण्याच्या तयारीला लागली आणि बालक बाहेर खेळावयास निघून गेले.

जेव्हा महिलेने कढईमध्ये एक चमचा दूध व एक तांदूळ टाकला. तेव्हा ती कढई तांदूळ व दूधानी काठोकाठ भरून गेली. तो चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. वृध्द महिलेने त्या बालकाला गावात सगळीकडे खूप शोधले परंतु तो सापडला नाही. त्या महिलेच्या सुनेनी जेव्हा ती खीर बघितली तेव्हा तिने गुपचूप एका वाटीत खीर घेऊन देवाला नैवेद्य दाखविला.
इकडे वृध्द महिला सगळीकडे बालकाला हाक मारत फिरत होती. तेव्हा अचानक एक आवाज आला, “आई, मी दरवाजाच्या पाठीमागे लपून गुपचूप खीर खाल्ली आहे. आता तू ती खीर पूर्ण गावाला वाटून खाऊ घाल.”

ती महिला सर्व गावात खीर वाटत-वाटत तोंडाने म्हणत होती, “बनवायची ती खीर, खा एका तांदळाची खीर.”

एका तांदळाची खीर बनविण्यासाठी नाही म्हणणारे ते महालात राहणारे सर्व लोक एका गरीब वृध्देची खीर खात देवाच्या चमत्कारापुढे नतमस्तक झाले.


तात्पर्य:यावरून आपल्याला असे समजते की, जर परमेश्वराची कृपा असेल तर एक चमचा दूध आणि एका तांदळाच्या दाण्याने सुध्दा पूर्ण गाव तृप्त होऊ शकते.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

मित्रांनो तुम्हाला या Bal goshti लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच Stories for kids in marathi आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Bal goshti कश्या वाटल्या जरूर सांगा व ह्या सर्व marathi goshti आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Marathi bodh katha लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Marathi bodh katha लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Stories for kids in marathi
Marathi Bodh katha

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Marathi bodh kathaलहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Marathi bodh katha व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Stories for kids in marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Marathi bodh katha छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि लहान मुलांचे गोष्टी मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ:-[ छान छान गोष्टी ]Marathi bodh katha


एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो.
       एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.


तात्‍पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi & marathi stories with moral values
         
              MARATHI STORY 2


अपमान आणि उपकार:- Marathi bodh katha लहान मुलांचे गोष्टी


एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.


तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3


कष्टाचे फळ:- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ] marathi stories for childrens


एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.
त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.

दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले. गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’


तात्पर्य - कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


दोघां भावातील खटला:- Chan Chan goshti || Marathi bodh katha



एकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला.
त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते.
न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले.
श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला.
न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली.
तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती.
आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.


तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवले पाहिजे आहे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || Marathi bodh katha

              Marathi story 5


सोन्याची अंडे देणारी कोंबडी:- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]


एका गावात एक खूप गरीब शेतकरी रहात असतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक कोंबडी विकत घेतो. जेणेकरून कोंबडी पासून मिळणारे अंडे विकून तो त्यापासून पैसे मिळवू शकतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आणलेल्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ते सोन्याचे अंडे बघून शेतकरी आश्चर्यचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले त्या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याने परत ते अंडे बाजारात विकले. अशा प्रकारे ती कोंबडी रोजच एक सोन्याचे अंडे देऊ लागली व तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली व तो चांगले व आनंदी जीवन जगू लागला.

एकदा त्याच्या मनात विचार येतो की, ‘कोंबडी जर रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील’ व आपण जर कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ. या हव्यासापायी तो त्या कोंबडीला मारतो. पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो खूप उदास होतो कारण कोंबडी मेल्यामुळे त्याला रोज मिळणारे सोन्याचे अंडे मिळणेही बंद झाले.


तात्पर्य - जेवढे आपल्याला मिळते त्यातच समाधान मानावे, कोणत्याही गोष्टींची जास्त हाव करू नये.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Marathi bodh katha आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular marathi bodh katha कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Stories for kids in marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




Parichay goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Parichay goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Stories for kids in marathi
Parichay goshti

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Parichay goshtiलहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Stories for kids in marathi व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Parichay goshti या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Parichay goshti मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


दोन मित्र आणि अस्वल:- parichay goshti [ छान छान गोष्टी ] Stories for kids in marathi


एका गावात राम व श्याम नावाचे दोन जिवलग मित्र रहात होते. राम हा शरीराने बारीक व श्याम हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या गावात जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’
वाटेत पुढे जाताना त्यांना एक अरण्य लागते. तेव्हा त्यांच्यासमोर एक अस्वल येते व ते त्यांच्या अंगावर धावून येते. त्या दोन मित्रापैंकी राम हा बारीक व चपळ असल्यामुळे जवळ असलेल्या झाडावर चढून बसतो. पण श्याम हा जाड असल्यामुळे त्याला पळणे शक्य नव्हते व झाडावर पण त्याला चढता येत नव्हते, तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन जमीनीवर पडतो. अस्वल त्याच्या जवळ येऊन त्याच्या कानाजवळ हुंगून बघतो आणि हे प्रेत आहे असे समजून त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून जातो.
अस्वल गेल्यावर झाडावर चढलेला राम खाली उतरून आपल्या सोबतच्या मित्राला विचारतो ‘श्याम, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले?’ श्याम उत्तरला ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लबाड मित्राच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस.’

तात्पर्य - खरा मित्र तोच जो संकटात धावून येतो.

🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲

Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 2


कासव आणि हंस:- Parichay goshti



एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.
खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.

एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.
‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.
कासवाच्या मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.

‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.
कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’
ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.
शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’

हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’
‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.

हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’
कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.

शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.


तात्पर्य - मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.

🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲

parichay goshti || gavakadchya goshti in Marathi

                   Marathi story: 3


जशी कारणी तशी भरणी :- Chan Chan goshti Marathi [ parichay goshti ]


     एका गावात एक माणूस राहत असतो. त्याच्या पत्नीचे नाव होत शांताबाई.  शांताबाई दिसायला खूप सुंदर होती. तो आपल्या पत्नीवर म्हणचे शांताबाईवर खूप प्रेम करत असे. पण शांताबाईचा स्वभाव खूप क्रूर असतो. ती आपल्या सासू-सासऱ्याशी नीट वागत नसे, नीट बोलत नसे. ते अंध असतात म्हणून ती  सासू-सासऱ्याशी छळत असते.

          एक दिवस शांताबाई त्याच्या नवऱ्याला सांगते कि तुमच्या आई वडिलांना जंगलात सोडून या. मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरुवातीला नवरा काही  ऎकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे- सारखे तेच सांगू लागली त्यामुळे  शेवटी निर्णय घेतला बायकोचे ऎकुन तो आपल्या अंध आई-वडिलांना जंगलात सोडून येतो. त्याचे आई-वडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण तो त्यांचे काहीच ऎकत नाही.

         आई-वडिलांना सोडून येत असतांना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथून एक साधू जात असतो तो त्याला बाहेर काढतो त्याच्या पायाला खूप लागले असते . त्यामुळे तो अपंग होतो.

        त्याला कळते आपण आपल्या अंध आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडिलांकडे  जातो. त्यांची क्षमा मागतो व त्यांना घरी आणतो.


तात्पर्य - संस्काराची बीजे लहानपणीच पेरले जातात.

🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


लोभी  विक्रेता :- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]


   एकदा एक व्यापारी आपल्या वस्तू विकायला गावात येतो. त्या गावात एक लहान मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. तिला कानात घालण्यासाठी कानातले घ्यायचे असते. पण तिच्याकडे पैसेच नसतात. ती आपल्या आजीला सांगते कि आपण आपली जुनी ताट विकून मला कानातले घेऊयात का? आजी तयार होते. आजी तिच्याकडे एक ताट देते.

        ती लहान मुलगी ते ताट घेऊन व्यापाऱ्याकडे जाते. व्य्पारी ते ताट नित निरखून पाहतो. त्याला समजते हे ताट सोन्याचे आहे. पण तो मुलीला ते सांगत नाही. उलट तो तिला म्हणतो  या ताटाला काहीच किंमत मिळणार नाही. मुलगी नाराज होते.
त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो.

          थोड्या  दिवसांनी दुसरा एक विक्रेता येतो. त्या मुलीला पुन्हा  कानात घालण्यासाठी कानातले घ्यायच्या असतात. तिची आजी पुन्हा तेच ते ताट त्या दुसर्या विक्रेत्याला दाखवते. तो त्या आजीला सांगतो कि, आजी हे ताट सोन्याचे आहे. आजीला आश्चर्य वाटते. तो विक्रेता त्या ताटाच्या मोबदल्यात त्यांना त्याच्याकडील सर्व वस्तू देऊन टाकतो.

        थोड्या दिवसांनी पुन्हा तो हावरट, लोभी दुकानदार येतो. ताटाबद्दल चौकशी करतो. आजी चांगलीच भडकते. खरा प्रकार लक्षात आल्यावर तो पळून जातो.


तात्पर्य - नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे.

🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲

marathi goshti || stories for kids in marathi
               Marathi story: 5

मुलगा आणि आई :- Parichay goshti

           एका गावात एक कुटुंब राहत होते. ते खूप धार्मिक होते. त्याची पत्नी खूप धार्मिक असल्यामुळे ते खूप दान-धर्म करत असतात. त्यांना एक मुलगा असतो. परंतु त्याला देव-धर्म करणे आवडत नसते.

           एक दिवस त्याची आई त्याला मंदिरात एका साधूचे प्रवचन ऐकण्यासाठी त्याला पाठवते. त्याच्या आईला आशा वाटते की  प्रवचन ऐकण्यामुळे तरी मुलात काही बदल होईल, ती त्याला प्रवचन ऐकण्याच्या बदल्यात पैसे देण्याचेही वचन देते. मुलगा पण तिचे ऐकतो आणि मंदिरात जातो. पण मंदिरात जाऊन प्रवचन ऐकण्याएवजी तो मंदिरात झोपतो.

          दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देते. तिला वाटते आपल्या मुलाने त्या साधूला घरी बोलावले असेल पण तो तसे काहीच कले  नाही. तो ते पैसे घेऊन बाहेरगावी जाऊन व्यापार करण्याचे निर्णय घेतो . त्याची आई त्याला नको जाऊ सांगते पण मुलगा तिचे काही ऐकत  नव्हता .

            तो बोटीत जात असतो आणि समुद्रात अचानक वादळ येते.बोट इकडे तिकडे भरकटू लागते. ती बोट पाण्यात बुडते, त्यात तो मुलगा पण बुडतो. आईचे न ऐकल्याची त्याला किंमत मोजावी लागते.


तात्पर्य - मोठ्यामाणसंचे ऐकल्याने  फायदा होतो.

🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲

मित्रांनो तुम्हाला या Parichay goshti लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Stories for kids in marathi कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व marathi goshti आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Gavakadchya goshti छान छान गोष्टी ||marathi chan chan goshti

Gavakadchya goshti छान छान गोष्टी ||marathi chan chan goshti

Marathi Chan chan goshti
Gavakadchya goshti

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Gavakadchya goshtiलहान मुलांचे गोष्टी marathi chan chan goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Gavakadchya goshti व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे छान छान गोष्टी उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Gavakadchya goshti या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Gavakadchya goshti शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या marathi chan chan goshti काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

👨‍👧‍👧👭👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👦‍👦👨‍👧‍👦👬👨‍👨‍👦👨‍👦👨‍👧‍👦👨‍👦👨‍👩‍👧‍👧

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1



तेनालीराम आणि कंजूस व्यापारी:- gavakadchya goshti [ छान छान गोष्टी ]


राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात एक कंजूस व्यापारी रहात होता. त्याच्याजवळ पैशांची कमतरता नव्हती, पण खिशातून एक पैसा पण काढताना त्याच्या अतिशय जीवावर येत असे. एकदा त्याच्या काही मित्रांनी त्याला एका चित्रकाराकडून त्याचे स्वःताचे चित्र बनविण्यास तयार केले. तेव्हा तो तयार झाला परंतु जेव्हा तो चित्रकार त्याचे चित्र बनवून घेऊन आला तेव्हा त्या व्यापाऱ्याची इच्छा होत नव्हती, की मूल्य स्वरूपात त्या चित्रकाराला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.

तो व्यापारी पण एक कलाकारच होता. चित्रकाराला येत असलेले बघून व्यापारी घरात गेला व काही वेळातच आपला चेहरा बदलून बाहेर आला त्याने चित्रकाराला सांगितले, ‘तू काढून आणलेले चित्र जरापण चांगले नाही, तूच सांग तू काढून आणलेल्या चित्रातील चेहरा माझ्या चेहऱ्याशी जरा पण मिळतो का?’ चित्रकाराने बघितले खरोखरच व्यापाराचा चेहरा व चित्रातील चेहरा वेगळा आहे. तेव्हा व्यापारी बोलला ‘जेव्हा तू असे चित्र बनवून आणेल की जे माझ्या चेहऱ्याला मिळते जूळते आहे, तेव्हाच मी तू आणलेले चित्र विकत घेईन.’ पुढे दुसऱ्या दिवशी चित्रकार आणखी एक चित्र बनवून आणतो जो हुबेहूब व्यापाऱ्याच्या चेहऱ्याशी मिळतो, जो पहिल्या दिवशी व्यापाऱ्याने बनविला होता. हया वेळेला पुन्हा व्यापाराने आपला चेहरा बदलला व चित्रकाराच्या चित्रामध्ये चुका काढू लागला. चित्रकार खूप अपमानित झाला त्याला हे समजत नव्हते की या प्रकारच्या चुका त्याच्या चित्रात का होत आहेत?

दुसऱ्या दिवशी तो आणखी एक चित्र बनवून घेवून आला, त्याच्याबरोबर पुन्हा तेच घडले. आता त्याला व्यापाऱ्याचा दुष्टपणा समजला होता. त्याला माहिती होते की व्यापारी कंजूस आहे, तो आपल्याला पैसे देणारी नाही. परंतु, चित्रकार आपल्या इतक्या दिवसांची मेहनत पण वाया जाऊ देणार नव्हता. खूप विचार केल्यानंतर चित्रकार तेनालीरामकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली.
काही वेळ विचार केल्यानंतर तेनालीराम बोलला, ‘उदया तू त्या व्यापाऱ्याकडे एक आरसा घेऊन जा, आणि त्याला सांग की तुझा खरा चेहरा घेऊन आलो आहे. चांगल्या प्रकारे मिळतो का बघून घे. थोडा पण फरक जाणवणार नाही. बस, मग काय तुझे काम झाले म्हणून समज.’ दुसऱ्या दिवशी चित्रकाराने तसेच केले.

तो आरसा घेऊन व्यापाऱ्याकडे पोहोचला आणि त्याच्या समोर आरसा ठेवला. ‘हे घ्या शेठजी तुमचे योग्य चित्र बनवून आणले आहे, यात जरापण चूक होणे शक्य नाही.’ चित्रकार आपले हसू सावरत बोलला.
‘परंतु हा तर आरसा आहे.’ व्यापारी गोंधळून बोलला.
‘तुमचा खरा चेहरा आरशा व्यतिरिक्त कोणीच बनवू शकत नाही. लवकरात लवकर माझ्या चित्रांचे मूल्य मला दया.’ चित्रकार बोलला.
व्यापाऱ्याला समजले की, हे सर्व तेनालीरामच्या हुशारीचा परिणाम आहे. त्याने लगेचच एक हजार सुवर्णमुद्रा चित्रकाराला दिल्या.

👨‍👧‍👧👭👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👦‍👦👨‍👧‍👦👬👨‍👨‍👦👨‍👦👨‍👧‍👦👨‍👦👨‍👩‍👧‍👧

stories for kids in marathi & marathi stories with moral values
         
              MARATHI STORY 2


सगळयात जास्त चतुर कोण ?Gavakadchya goshti


एक दिवस, बोलता बोलता राजा कृष्णदेव रायने तेनालीरामला विचारले ‘कोणत्या प्रकारचे लोक सगळयात जास्त मुर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात?’

तेनालीरामने त्वरीत उत्तर दिले ‘ब्राम्हण हे सगळयात जास्त मुर्ख असतात व व्यापारी हे सगळयात जास्त चतुर असतात.’
‘हे तू काय बोलत आहेस, तेनालीराम? ब्राम्हण हे उच्चशिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राम्हणांबरोबर तुलना कशी करू शकतो?’ राजा बोलला.
‘महाराज! मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो.’ तेनालीराम बोलला.
‘कसे?’ राजाने विचारले.
‘मी उदया राजदरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल.’

दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार पूर्ण भरलेला होता, तेव्हा तेनालीराम बोलला आपल्या अध्यात्मिक गुरूंना बोलवावे. राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला ‘मी हे आत्ता सिध्द करून दाखवेल महाराज, परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन दया तेव्हा मी कामास सुरूवात करेन.’
राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले. तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले ‘राजगुरू, महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे, याबद्दल तुम्हाला तुम्ही मागाल ते बक्षिस मिळेल.’
राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून दयावी? परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो. त्यांनी सांगितले ‘तेनालीरामजी, मी शेंडी कशी देऊ शकतो.’

तेनालीराम बोलला ‘राजगुरूजी, आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात. शेंडी अशी वस्तु तर नाही ना, जी परत येऊ शकत नाही, आणि महाराज आपण मागाल ते बक्षिस दयायला पण तयार आहेत.’ राजगुरूंना मनातल्या मनात समजले की हा तेनालीरामचा काही तरी डाव आहे.
तेनालीरामने विचारले ‘राजगुरूजी, आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षिस पाहिजे?’
राजगुरूंने सांगितले की ‘पाच सुवर्ण मुद्रा खूप होतील.’

पाच सुवर्णमुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केशकर्तन करणाऱ्याला बोलवून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली.
आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिध्द व्यापाराला बोलविले.
तेनालीरामने व्यापाराला सांगितले ‘महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे.’
‘सर्व काही महाराजांचेच आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी एक गरीब माणूस आहे.’ व्यापारी बोलला.
‘तुम्हाला तुमच्या शेंडीची मागाल ती किंमत दिली जाईल.’ तेनालीराम बोलला.
‘सर्वकाही तुमची कृपा आहे परंतु....’ व्यापारी बोलला.
‘तू काय बोलू इच्छितो?’ तेनालीरामने विचारले.
‘खरे तर, या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो. माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हापण याच कारणामुळे पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी दहा ते बारा हजार सुवर्ण मुद्रा उधार मिळतात.’ आपल्या शेंडीवर हात फिरवत व्यापारी बोलला.

‘या प्रकारे तुमच्या शेंडीची किंमत पंधरा हजार सुवर्ण मुद्रा झाली आहे. ठिक आहे! तुला तुझी ही किंमत दिली जाईल.’
पंधरा हजार सुवर्णमुद्रा व्यापाराला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला. जसे न्हाव्याने शेंडीजवळ वस्तारा नेला, व्यापारी जोरात बोलला ‘सांभाळून न्हाव्या, तुला माहित नाही का ही महाराज कृष्णदेवराय यांची शेंडी आहे ते.’
हे ऐकून राज चिडला व बोलला, ‘या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो? त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका.’
व्यापारी पंधरा हजार सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला.
काही वेळानंतर तेनालीराम बोलला, ‘आपण बघतले का महाराज, राजगुरूंनी पाच सुवर्णमुद्रा घेवून आपली शेंडी कापून दिली व व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रा घेवून गेला त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला. तुम्हीच सांगा, ब्राम्हण चतुर की व्यापारी?’
राजा बोलला ‘तू योग्य सांगितले होते, की व्यापारी चतुर असतात.’

👨‍👧‍👧👭👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👦‍👦👨‍👧‍👦👬👨‍👨‍👦👨‍👦👨‍👧‍👦👨‍👦👨‍👩‍👧‍👧

लहान मुलांचे गोष्टी मराठी गोष्ट || stories for kids in marathi

                  Marathi story: 3


पुरोहिताचा बदला:- Chan Chan goshti ||Gavakadchya goshti


           खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाच्या मालकीची एक खूप मोठी फळांची बाग होती. त्या बागेत खूप माकडे रहात होती.  एकदा त्या बागेतून राजपुरोहित जात होते. त्या बागेतील माकडांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यामुळे पुरोहित चिडले त्यांनी या त्रासाचा बदला घेण्याचा ठरविले.

         त्यामुळे माकडांच्या प्रमुखाला काळजी वाटू लागते. तो सगळ्या माकडांना  बाग सोडून जायला सांगतो. पण काही माकडे ती बाग सोडून दुसरीकडे जातात आणि काही माकडे तिथेच राहतात.

         काही दिवसांनी राजाच्या तबेल्याला आग लागते आणि त्या आगीत खूप घोडे पोळले जातात. राजा चिंतेत पडतो मग तो आपल्या पुरोहिताला सल्ला विचारतो.
   
       पुरोहिताला माकडांचा सूड घेण्यासाठी ही खूप मोठी संधी असते. तो राजाला सांगतो की, ' घोड्यांना बरं करण्यासाठी  माकडांचे मांस जखमेवर लावणे सर्वात उत्तम .' लगेचच राजा त्याच्या सैनिकांना सांगतो  की बागेतल्या सगळ्या माकडांना मारून टाका आणि त्यांचे मांस आणा.
  अशाप्रकारे ज्या माकडांनी त्यांच्या प्रमुखाचे ऐकले नाही त्यांना प्राण गमवावे लागले.

👨‍👧‍👧👭👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👦‍👦👨‍👧‍👦👬👨‍👨‍👦👨‍👦👨‍👧‍👦👨‍👦👨‍👩‍👧‍👧

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


मनाची एकाग्रता [ लहान मुलांचे गोष्टी marathi chan chan goshti ]


 एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''

👨‍👧‍👧👭👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👦‍👦👨‍👧‍👦👬👨‍👨‍👦👨‍👦👨‍👧‍👦👨‍👦👨‍👩‍👧‍👧

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || Marathi bodh katha

              Marathi story 5


आईची थप्पड :- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]


            एका छोट्या गावची गोष्ट आहे. त्या गावातील एका शाळेमधील छोट्या मुलाची गोष्ट आहे. एकदा एका मुलाने वर्गातील मुलाचे पुस्तक चोरले. घरी येउन त्याने ते पुस्तक आईला दाखविले. त्याच्या आईने त्याला ओरडण्याऐवजी त्याला ते पुस्तक स्वत :कडेच ठेवायला सांगितले.

           त्या मुलाला  वाटले की, चोरी करण्यात काहीच चूक नाही. कारण त्याच्या आईनेच त्याला प्रोत्साहन देत होती. थोड्याच दिवसात त्याने कपडे चोरले. ते त्याने आईला दाखवले. आईने त्याला रागवायचं सोडून त्याचे पुन्हा  खूप कौतुक केले. काही वर्षांनी मुलगा मोठा झाला.पण त्याची चोरी करण्याची सवय गेली नाही.

           पुढे तो मोठ-मोठ्या वस्तू चोरायला लागला. तो मोठा चोर बनला. पण एक दिवस तो एका चोरीमध्ये त्याला पोलिसाने पकडला गेला. पोलीस जेव्हा त्याला जेलमध्ये घेऊन जात असताना तेव्हा त्याची आई रडायला लागली. आईला रडताना पाहून तो मुलगा पोलिसांना म्हणाला, मला माझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे.

          तो आईच्या कानाजवळ गेला आणि कानाला कचकन चावला. त्याचे असे वागणे पाहून त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला. आईने त्याला एक थोबाडीत मारली.

        मुलगा त्याच्या आईला म्हणाला,"हीच थोबाडीत जर तू मला पहिल्यांदा पुस्तक चोरलं होतं तेव्हा मारली असतीस तर आज ही वेळ आली नसती. "मुलाने बरोबर म्हटले होते. आईनेच त्याला चोर बनवले होते.

👨‍👧‍👧👭👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👦‍👦👨‍👧‍👦👬👨‍👨‍👦👨‍👦👨‍👧‍👦👨‍👦👨‍👩‍👧‍👧

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Gavakadchya goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Gavakadchya goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




Moral story in marathi || marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी

Moral story in marathi || marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी

Chan chan goshti
Moral story in marathi

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Moral story in marathiलहान मुलांचे गोष्टी marathi goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Moral story in marathi व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Moral story in marathi शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या marathi goshti मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


घाबरट  शिकारी :- Moral story in marathi


        खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होते त्या गावाजवळ एक जंगल होते. त्या जंगलात एक सिंह राहत होता. जेव्हा सिंह भूक लागेल तेव्हा तो  गावात जायचा आणि पाळीव प्राण्याची शिकार करून न्यायचा व शेतकऱ्यांचे नुकसान करायचा. सिंहाच्या या त्रासाला सर्व गावकरी कंटाळले होते. सगळे गावकरी या सिंहाला घाबरून राहत होते.

        सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि जे कोणी  सिंहाला मारेल त्याला बक्षीस द्यायला तयार झाले. तेव्हा एक शिकारी गावात आला व त्याने  सिंहाला मारण्याचे आव्हान स्विकारले.

        पण तो शिकारी काही फार मोठा शूरवीर नव्हता. परंतु त्याने आपण शूर आहोत असा आव आणला आणि तो जंगलात गेला. सिंहाच्या पाऊलखुणा शोधण्याचा त्याने प्रयत्न सुरु केला.

   शिकारी फिरत आसताना त्याला जंगलात एक लाकुडतोड्या भेटला. शिकाऱ्यांने त्याला विचारले कि, सिंहला पहिले का?

        लाकुडतोड्या म्हणाला, चल मी तुला प्रत्यक्ष सिंहच दाखवतो. "हे ऐकताच शिकारी घाबरला. सिंहाचे दर्शन घ्यायचे या कल्पनेनेच तो घाबरला. शिकारी त्याला घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "नको धन्यवाद ! मी तुला सिंहाच्या पाऊल खुणाविषयी विचारले आहे. सिंहाच्या प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. "घाबरट शिकारी शिकार करण्याऎवजी तेथून पळून गेला.


तात्पर्य -  नेहमी खरे बोलावे.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

Moral story in marathi || marathi goshti
         
              MARATHI STORY 2


धूर्त बोकड :-लहान मुलांचे गोष्टी


            एक बैल जंगलात चरण्यासाठी जात असे. त्या जंगलात जवळच गवताळ कुरण होते तिथे बैल चरत होता. त्याच्या नकळत एक सिंह त्याच्यवर लक्ष ठेऊन होता. लांबवर एका झुडपाच्या मागे लपून सिंह, बैल शिकारीच्या टप्यात येण्याची वाट बघत होता.

         सिंहाने बैलावर हल्ला केला पण बैलाने संधी साधून सिंहच्या तावडीतून स्वताची कशीबशी सुटका करून घेतली. बैल एका गुहेत आश्रयासाठी पळून गेला. या गुहेचा वापर मेंढपाळ स्वतासाठी आणि मेंढयांसाठी करीत असत. जोरदार पाउस किंवा वादळवारे सुटलेल्या मेंढपाळ मेंढ्यांना या गुहेत नेत असत.

        बैल गुहेत शिरला तेव्हा त्या गुहेत एक बोकड राहिलेले होता. गुहेत बैल आलेला पाहून बोकड रागावला. आपल्या ताकतीची पर्वा न करता तो बैलाच्या अंगावर धावून गेला. आपल्या छोठ्याशा शिंगांनी बैलाला जखमी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. बैल त्याला काहीच प्रतिकार करत नव्हता. गुहेच्या बाहेर सिंह उभा आहे हे माहीत असल्यामुळे बैलाने त्याला प्रतिकार केला नाही.

         बैल बोकडाला म्हणाला ,"मी तुला घाबरत आहे असे तू वाटू देऊ नको. तू मनातही असा विचार अनु नकोस. ज्या क्षणी सिंह गुहेच्या दारापासून निघून जाईल त्या क्षणी मी तुला आयुष्यभर लक्षत राहील असा धडा शिकवेन ." बोकडाला आपली चूक समजली आणि त्याने बैलाची क्षमा  मागितली.


तात्पर्य -  आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी

                   Marathi story: 3


उंटाचा नाच :- Moral story in marathi


           एका जंगलात खूप प्राणी रहात होते. एकदा जंगलातील सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचा बेत ठरवला. या कार्यक्रमात सर्वांनी आपणास येणारी कला सादर करण्यची असे ठरवण्यात आले. प्रत्येक प्राणी त्या दिवसाची उसुकतेने वाट बघत होता. अखेर तो दिवस उजाडला. कार्यक्रम सुरु झाला. प्रत्येक प्राणी येऊन आपला कलेचे प्रदर्शन करू लागला.

       अखेर माकडाची वेळ आली. माकडाने सर्व प्राण्यांना खुश केले. त्याने अनेक कसरती करून प्राण्यांना आनंदित केले. प्रत्येकाला आश्चर्य वाटले. सर्व प्राण्यांनी माकडाची स्तुती केली. त्याच्या कलेचे कौतुक केले. सर्वच प्राण्यांनी त्याला टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला.

        एक उंट हे सगळे लांबून बगत होता. त्याने माकडासाठी  टाळ्याही वाजवल्या नाहीत आणि त्याचे अभिनंदनही केले नाही. तू मनातल्या मनात माकडाचा द्वेष करू लागला. माकडापेक्षा चांगली कला सदर करण्यासाठी आणि सर्व प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उंट नाचू लागला.

       आपल्या नाचण्याच्या कलेतून सर्व प्राण्यांचे मन जिंकण्याचा उंटाने प्रयत्न  केला पण उंटाचा  नाच उरलेल्या प्राण्यांना आवडला नाही. सर्व प्राण्यांकडे दुर्लक्ष करून तो नाचतच राहिला. नाचाला कंटाळलेल्या प्राण्यांनी उंटाला मारून  काढले. उंटाचा अपमान करून त्याला हाकलून दिले.


  तात्पर्य - कलेचा आदर करावा

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


जंगली बकऱ्या :- Moral story in marathi


     एक गावात राम राहत होता. त्याच्याकडे खूप बकऱ्या होत्या. तो बकऱ्याचे दुध विकून पैसे कमवित असे. एक दिवस बकऱ्या घेऊन तो जंगलात गेला. बकऱ्या  नेहमी प्रमाणे चारा खाऊ लागल्या.

        जंगलात याच वेळी काही जंगली बकऱ्या चरत होत्या. जेव्हा हा राम पाळीव बकऱ्या घेऊन घरी निघाला. तेव्हा त्याच्या कळपात काही जंगली बकऱ्या घुसल्या. त्याच्या कळपात घुसलेल्या जंगली बकऱ्याना घरी पोहोचल्यावर त्या रामने या सगळ्या बकऱ्यांना सुरक्षित जागी बांधून टाकले.

         दुसऱ्या दिवशी अकस्मात बर्फ पडू लागला म्हणून राम आपल्या बकऱ्या चरायला बाहेर नेऊ शकला नाही. त्यांना घरातच चारा द्यावा अशा विचारात तो होता. जंगली बकऱ्या आपल्या घरी राहाव्यात असाही त्याचा विचार होता. फुकट मिळालेल्या बकऱ्यांना ठेवून घेण्यासाठी त्याने जंगली  बकऱ्यांना जादा गवत खायला दिले.
      पाळीव बकऱ्या हे सगळे बगत होत्या. पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. बर्फ पडण्याचे थांबल्यावर जंगली बकऱ्या बाहेर पळून गेल्या. रामला राग आला. तो जंगली बकऱ्यांना म्हाणाला, " मी तुम्हाला जास्त चारा खायला दिला तरी तुम्ही येथून पळून जात आहात ."

        जंगली बकऱ्या म्हणाल्या ,जर आम्ही तुझा बरोबर राहिलो आणि उद्या नव्या बकऱ्या कळपात आल्या तर तू त्यांना आमच्या पेक्षा जास्त खायला देणार. नव्या बकऱ्या आल्या की जुन्या बकऱ्ययांवर अन्याय  करणार. हे ऐकताच रामचा चेहरा पडला. बकऱ्या खर बोलत असल्यामुळे राम  निरुत्तर झाला.


तात्पर्य -  आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.


🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

lahan mulanchya goshti || Chan chan goshti

                 Marathi story : 5


बोलणारे हरीण :- Moral story in marathi


         एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक हरीण राहत होते. ते सामान्य हरीण नव्हते. ते खूप ताकतवान आणि माणसांप्रमाणे बोलणारे हरीण होते.

         एक दिवस एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात येतो. राजा त्या बोलणाऱ्या हरिणाला पाहतो आणि बाणाचा नेम धरतो.
         हरणाला समजते कि राजाने आपल्या दिशेने नेम धरलेला आहे. ते पाहून हरीण जोरात धावते. राजपण त्याच्या मागे धावत असतो . राजा हरिणाच्या मागे धावत असताना पुढे एक भला मोठा खड्डा येतो पण त्याला समजत नाही . धावता धावता राजा त्या खड्ड्यात पडतो. हरणाला राजाची दया येते.

            हरीण राजाला मदत करण्याचे ठरविते आणि त्याच्याजवळ जाऊन राजाला म्हणते, 'मला वाटते कि तुला मोठी जखम झाली नसेल . मी तुला येथून बाहेर काढतो.'

            राजाला हरिणाचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटते. त्याला समजते कि हे हरीण सामान्य नाही. हरीण राजाला बाहेर निघण्यासाठी मदत करते. राजाला आपल्या कृत्याची लाज वातू लागते . तो हरिणाची माफी मागतो.


तात्पर्य - दुसर्यांना नेहमी मदद करावी.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

मित्रांनो तुम्हाला या Moral story in marathi लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील marathi goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






lahan mulanchya goshti लहान मुलांचे गोष्टी || marathi bodh katha

lahan mulanchya goshti लहान मुलांचे गोष्टी || marathi bodh katha

Stories for kids in marathi
Lahan mulanchya goshti

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता lahan mulanchya goshtiलहान मुलांचे गोष्टी marathi bodh katha चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. lahan mulanchya goshti व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे marathi bodh katha उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👬👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1



निळा राजा :- lahan mulanchya goshti [ छान छान गोष्टी ]


      एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत  होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते  घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते.
   
             त्या परटाने  कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते.
लांडगा परीटाच्या घरात पोहचला आणि त्याने सरळ खिडकीतून घरात उडी मारली. लांडग्याची उडी नेमकी निळीच्या भांड्यात पडली. लांडगा त्या भांड्यात लपून बसला. पाठलाग करणारी कुत्री घराबाहेर घुटमळली आणि थोड्या वेळाने निघून गेली.

           सकाळ होताच लांडगा घरा  बाहेर पडला आणि जंगलात पळून आला. आपला रंग निळा झाला आहे हे त्याला माहितच नव्हते. लांडगा जंगलात पोहताच त्याला बघून अनेक प्राणी पळून गेले. निळ्या रंगाचा प्राणी ते प्रथमच  बघत होते. लांडग्याला काहीच समजत नव्हते कि हे  सगळे प्राणी आपल्याला का घाबरत आहेत ?

           नदीजवळ जाताच लांडग्याने स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघितले त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वत:चे निळे प्रतिबिंब बघून त्याला समजले कि जंगलातील प्राणी आपणास का घाबरत आहेत ते..!

      सर्व घाबरलेल्या प्राण्याचा लांडगा राजा झाला आता त्याचे दिवस मजेत चालले होते. एके रात्री जंगलातले काही लांडगे एकत्र आले आणि जोरजोरात आरोळ्या ठोकू लागले. 'निळा लांडगा' स्वत:चे राजेपण विसरून ओरडू लागला. निळ्या लांडग्याचा आवाज ऐकताच जंगलातील सर्व प्राण्यांना त्याचे खरे रूप कळले. आपण मूर्ख बनलो हे  प्राण्यांना कळले सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी त्या लांडग्याला जंगलाबाहेर हुसकून लावले. 


तात्पर्य - असत्य जास्त काळ टिकत नाही


👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👬👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦

stories for kids in marathi & marathi stories with moral values
         
              MARATHI STORY 2


लोभी बगळा आणि हुशार खेकडा:-【 lahan mulanchya goshti 】


     एका जंगलात एक तळे होते. त्यात एक म्हातारा बगळा रहात होता. म्हातारपणामुळे तळ्यातील मासे पकडण्याची शक्ती सुद्धा नव्हती.

         एके दिवशी भुकेने व्याकूळ झाल्याने तो बगळा त्या तळ्याकाठी रडत बसला होता. त्याचे रडणे ऐकून जवळच राहणारा खेकडा त्या बगळ्याची विचारपूस करण्यास आला, ''बगळेकाका, आज आपण इथं रडत बसलात तेव्हा आपल्या जेवणाची काही सोय नाही का?''

     बगळ्याने सांगितले, ''बाळ, तुला काय सांगणार! मी आजपासून हिंसा करायची नाही असं ठरवलंय. उपासमारीने जीव गेला तरी चालेल... पण मी निश्चय सोडणार नाही. माझ्या अंगी आता एकदम वैराग्य आलंय! माझ्या आसपास इतके मासे हिंडताहेत पण मी ढुंकूनसुद्धा बघत नाही!''

खेकडा विचारतो, ''पण काका, हे वैराग्य अचानक कसं आलं? त्यामागे काही कारण घडलं कां?''

       त्याबरोबर बगळा धूर्तपणे उत्तर देतो, ''बाळा! या तळ्यातच माझ्या जन्मापासून आजपर्यंत मी आयुष्य काढले. एका ज्योतिषाने मला भविष्य सांगतिल्याने मी दु:खी आहे!''खेकडा विचारतो, ''कसलं भविष्य?''

                ''अरे, आता बारा वर्षे पाऊस न पडून या तळ्यातले पाणी पूर्ण आटून जाणार. हे भविष्य ऐकल्यावर मी अतिशय दु:खी झालो आहे. '' बगळा डोळे पुसत बोलत होता, ''आता या तळ्यातले पाणी हळूहळू आटते आहे. ज्यांच्याबरोबर आज इतकी वर्षे आंनदात काढली ते आता नाश पावणार. छे! ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही!'' खेकडा घाबरून विचारतो, ''बगळेकाका, यावर उपाय नाही का?''

                 बगळा विचार करून सांगतो, ''आहे! एक उपाय निश्चित आहे! येथून जवळच एक मोठे तळे आहे. बाराच वर्षे नाही तर चोवीस वर्षे जरी पाऊस नाही पडला तरी पाणी आटणार नाही. माझ्या पाठीवर बसून येण्यास जे तयार होतील त्यानाच त्या तळ्यात जाता येईल.''

               त्या खेकड्याने पाण्यातील सर्व प्राण्यांना ही गोष्ट सांगितली त्याबरोबर सर्व प्राणी ''मला आधी घेऊन जा, मला मला आधी घेऊन जा'' चा घोष करीत बगळ्याकडे येतात.
प्रत्येक प्राण्याला आपल्या पाठीवरून नेऊन बगळा तळ्याजवळच काही अंतरावरील दगडाच्या शिळेवर त्या प्राण्याला आपटून मारी. त्याला खाऊन टाकल्यावर पुन्हा दुसरा मग तिसरा... असा त्या प्राण्यांना खायचा क्रम बगळ्याने लावला.

                खेकड्याला आता बगळ्याबद्दल संशय होता. म्हणून तो बगळ्याला विचारतो, ''बगळेकाका, खरं म्हणजे तुमची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली. पण मला अजून तुम्ही त्या सरोवरात घेऊन गेलेच नाही.''

             बगळाही धूर्तपणे विचार करतो, ''रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. रुचिपलट म्हणून आज खेकड्याला खाऊ.'' बगळा खेकड्याला सांगतो, ''चल तर...बस पाठीवर!''

              बगळा त्या नेहमीच्या शिळेजवळ खेकड्याला आणतो. खेकड्याला आजूबाजूला हाडे, काटे आणि मांस पडलेले दिसते. खेकडा बगळ्याला म्हणतो, ''काका...तुम्हीही थकला असाल. इथं विश्रांती घेऊ आणि मग त्या तळ्याकडे जाऊ.''

           बगळा आपल्या पाठीवर बसलेला खेडका आपल्या तावडीत अडकलेला बघून खेकड्याला सांगतो, ''अरे मूर्खा...तळे बिळे काही नाही!'' आता तुला विश्रांती देतो माझ्या पोटात. तिकडे तुझे सर्व मित्र भेटतील.

           चल घे देवाचं नाव!'' बगळ्याचा दुष्टपणा लक्षात आल्यावर खेकडा आपल्या दोन्ही नांग्यांनी बगळ्याची गोष्ट संपवतो आणि तळ्यावर जाऊन सर्व घडलेली हकीकत सांगतो आणि म्हणतो, ''जे या तळ्यात राहिलेत त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून आपण सर्व वाचलोत ! नशीब तुमचं...मी मध्येच मला न्यायला बगळ्याला सांगितलं! आता मी त्याला ठार मारल्याने आपण सुखाने राहू.''


तात्पर्य : लोभाच्या अतिरेकामुळे प्राण हि गमवावा लागतो.


👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👬👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦

lahan mulanchya goshti लहान मुलांचे गोष्टी || stories for kids in marathi

                   Marathi story: 3

सिंहाचे  कातडे पांघरलेले गाढव :- Chan Chan goshti Marathi

            एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या  प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.

          एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .

         सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.

         थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,"जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते". गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.       


तात्पर्य - आति शहाणा त्याचा बैल रिकामा


👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👬👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4

दवबिंदू आणि  गाढव:- Chan Chan goshti

       एका जंगलात खूप प्राणी राहत होते. त्या जंगलात गाढव पण राहत होते. एके दिवशी ते गाढव त्याच्याच नादात चालत होते आणि ते खूप उदास होते. सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते. त्याला वाटत होते की, आपला आवाज मधुर व्हावा. तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधुर स्वर आला.

          तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नाकातोड्याजवळ पोहचला. नाकतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता. तो आवाज ऐकून गाढवाला काही शांत बसवेना. गाढवाने त्याला विचारले, तू काय खातोस ? काय पितोस ? तुझा आवाज इतका गोड कसा? याचे रहस्य मला सांग .
 
        नाकतोडा खूप खोडकर होता. तो गाढवाला चेष्टेत म्हणाला,"मी तर दवबिंदू पितो म्हणून माझा आवाज इतका मंजुळ आहे.जर तुला असा मंजुळ आवाज हवा असेल तर तुला पण हेच करावे लागेल  ."

        गाढवाला तर मधुर आवाज पाहिजे होता, त्याने नाकतोड्याचे बोलणे खूप गंभीरतेने घेतले. गाढवाने ठरवले की,आता दवबिंदूच प्यायचे. बाकी काहीच खायचे नाही.
        हळूहळू गाढव खूप अशक्त होऊ लागले आणि शेवटी ते मरण पावले. म्हणूनच आपल्याला गाढवासारखे मूर्ख बनायचे नाही. कोणाचाही सल्ला विचार न करता अमलात आणू नये.

    असे केल्यामुळे नुकसान आपलेच होते. म्हणूनच नेहमी स्वत : विचार करायला हवा.


तात्पर्य  - ऐकावे जनाचे करावे मनाचे


👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👬👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦

lahan mulanchya goshti || stories for kids in marathi

               Marathi story: 5

सोनेरी शिंगाचे  हरिण :- Kids story in Marathi

            एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.
 
          एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि  मागे  वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.

          शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.
हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच  पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले


तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत .


👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👨‍👨‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👧‍👦👨‍👨‍👦👨‍👨‍👧‍👧👬👨‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी lahan mulanchya goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
marathi bodh katha कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏