मराठी निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी निबंध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझा आवडता खेळ निबंध maza avadta khel in marathi || Marathi Nibandh

माझा आवडता खेळ निबंध maza avadta khel in marathi || Marathi Nibandh

Maza avadata khel in Marathi
Maza avadata khel

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझा आवडता खेळ निबंध School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये maza avadta khel in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Essay on my favourite game in Marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.




शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी Information about cricket in Marathi Or maza avadta khel in marathi हे मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझा आवडता खेळ निबंध कडे.

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒


माझा आवडता खेळ निबंध मराठी maza avadta khel in marathi || Marathi Nibandh               

लहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल? तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो! एकदा भारत अशाच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला, तेंव्हा मला माझे अश्रू अनावर झाले, इतकं माझं क्रिकेटवर प्रेम होतं.

कालोघात ते सवंगडीही मागे पडले व तो खेळही मागे पडला. गेल्या दहा वर्षांत मी क्वचितच क्रिकेट खेळलो असेन. का कोणास ठाऊक? पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे?’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.

आय.पी.एल. ची लोकप्रियता ही तर माझ्यासाठी अगदी अनाकलनीय आहे! पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात! पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही!? आता काही लोक मला त्या टिममधील मराठी खेळाडूंची नावे सांगू लागतील.. पण मी इथे अपवादांबद्दल बोलत नसून संपूर्ण टिमबाबत बोलत आहे.

लोकांनी स्वतःहून क्रिकेट खेळावे त्यातून चांगला शारिरीक व्यायाम होतो, पण सतत टि.व्ही. वर दुसर्यांचा खेळ पाहून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर असा बदल होत असेल, तर आपण योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतर आपल्या आवडी-निवडी बदलायची वेळ आली आहे, असे निश्चित समजावे!


माझा आवडता खेळ क्रिकेट Information about cricket in Marathi

 🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.

भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.


क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत cricket information in Marathi

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.


क्रिकेटची साधने व पटांगण [माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध]


चेंडू - वजन १५५ ग्रॅम्स, परिघ २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.

विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.

पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.


Cricket खेळाची सुरूवात [मराठी निबंध माझा आवडता खेळ]

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.

फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.

ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

माझा आवडता खेळ निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे maza avadta khel in marathi or Information about cricket in Marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





माझी शाळा निबंध Marathi nibandh || mazi shala in marathi || Essay on my school in Marathi

माझी शाळा निबंध Marathi nibandh || mazi shala in marathi || Essay on my school in Marathi

Essay on my school in marathi
Mazi shala in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझी शाळा निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये mazi shala in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Essay on my school in Marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये 2 निबंध माझी शाळा वर उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी शाळा निबंध कडे.

🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫



माझी शाळा निबंध मराठी || mazi shala in marathi nibandh || Essay on my school in Marathi

                        [No.1] 

मला वाटतं पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आणि माझी शाळा इथेच थांबत नाही; ती शिक्षणाच्या विविध पद्धतींवर विश्वास करते. एज्युकेशन आणि लर्निंग मध्ये काय फरक आहे? मलाही तोच प्रश्न होता म्हणून मी आमच्या आदरणीय प्राचार्य महोदयांना विचारले, मी तुम्हाला हे सांगू शकेन, त्या फार चांगले समजावून सांगतात. त्यांनी मला सांगितले, पाठ्यपुस्तकांतून मिळते ते एज्युकेशन आणि आयुष्या मध्ये जे कायमचे शिक्षण चालते ते लर्निंग, आणि म्हणूनच आमच्या शाळेत खेळ, इतर शैक्षणिक उपक्रम, मोठ्या विद्यापीठांच्या शिक्षण यात्रा, अतिथी व्याख्यान वगैरे होत राहतात. माझ्या शाळेने माजी विद्यार्थी नेटवर्कची स्थापना केली आहे, त्यासाठी माझी शाळा लिंक्डइन स्कूल टूल आणि अलुमणी नेटवर्क साधनांचा वापर करते. 


            माझ्या शाळेचे बरेच माजी विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्सला, आयटी सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, आणि ते जगातल्या वेगवेगळ्या देशांत आहेत. माझी शाळा या माजी विद्यार्थ्याच्या अनुभवाचा आणि काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रगती साठी करत आहेत. मला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आमच्या उपनगरातील कोणत्याही इतर शाळेत ही सोय नाही आणि यामध्ये पूर्णपणे आमच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम चे श्रेय आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, त्या एक समर्पित, टेक-प्रेमी आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल आहे. मी आशा करतो प्रत्येक शाळेला असे लीडर्स मिळावेत, मग भारतीय शिक्षण प्रणालीचा कायापलट व्हायला वेळ लागणार नाही.


या मध्ये माझ्या शाळेचे शिक्षक ही मागे नाहीत, सर्व शिक्षक MSCIT झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे की भारत आयटी हब आहे, आमच्या शाळेने भविष्यातील या संधींचा लाभ घेण्यासाठी शाळेमध्ये आयटी एज्युकेशन चालू केले आहे. आमचे कॉम्पुटर चे शिक्षक बी.टेक कॉम्पुटर सायन्स झालेले आहेत, आणि ते आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थीं आहेत. त्यांना कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडलं. आपल्या सगळ्यांना यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे. माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत, माझ्या शाळेची वेबसाईट सुद्धा आहे, आणि आमच्या शाळेची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे. आमच्या जवळ पासच्या भागात इतकी तंत्रज्ञान प्रेमी शाळा नाही, आणि यामुळे मला माझ्या शाळेबद्दल अभिमान वाटतो.


जरी माझ्या शाळेने अश्या मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत, तरीही ऍडमिशन फीस (प्रवेश शुल्क) नाममात्र आहे. अन्य प्रतिस्पर्धी शाळांमध्ये शुल्क जवळपास दुप्पट आहे आणि खूप लपविलेले शुल्क सुद्धा असतात. भारतीय पालक शिक्षणाबद्दल फारच गंभीर आहेत, ते आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्षमतेमध्ये जे काही करू शकतात ते करतात. बऱ्याच खाजगी शाळा याचा फायदा घेतात आणि जास्त प्रमाणात देणगी आणि फी मिळविण्याचा प्रयत्न करतात. माझे पालक माझ्या शाळेचे आपल्या मित्रांच्या समोर अभिमानाने कौतुक करतात. त्यांचे काही मित्र आपल्या मुलांना माझ्या शाळेत स्थानांतरित करणार आहेत. पालकांचा आदर राखल्याबद्दल मी आमच्या शाळेचे आभार मानले पाहिजे.


मी माझ्या शाळेबद्दल खूप वेळ बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादेमुळे मला जास्त बोलता येणार नाही. आमची शाळा शहरातील उत्तम शाळांपैकी एक आहे, शिक्षणाची गुणवत्ता, भविष्यकालीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माझी शाळा इतरांपासून खूप वेगळी आहे, आणि मला याचा खूप अभिमान आहे. मला आशा आहे की,माझी शाळा अशीच प्रगती करत राहो आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे. प्राचार्य महोदया, शाळेबद्दलचे माझे मत व्यक्त करण्यास मला अनुमती देण्यासाठी मी आपला आभारी आहे.


🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫🏤🏫



Majhi shala nibandh in Marathi || माझी शाळा निबंध My School Essay In Marathi 


                        [ No.2]


माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर आहे, आणि तिची इमारत २ नद्यांच्या संगमावर आहे . माझी शाळा अर्ध्या एकराच्या क्षेत्रात पसरलेली आहे, त्यामध्ये शाळेची इमारत, कॅम्पस आणि एक मोठे मैदान आहे. माझी शाळा सेमी-इंग्रजी शाळा आहे आणि मुख्य भाषा मराठी आहे, आमच्याकडे ५वी ते १०वी पर्यंत ६वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात अ आणि ब तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आहे, आणि माझ्या शाळेची एकूण संख्या ६५० एवढी आहे. माझी शाळा ग्रामीण भागात आहे, शाळेत मुलींची संख्या वाढवण्यासाठी आमची शाळा दरवर्षी मोहीम चालवते, आणि याचे परिणाम खूप चांगले आहेत.

माझ्या शाळेबद्दल मला सगळ्यात जास्त आवडणारी एक गोष्ट म्हणजे लिंग, धर्म किंवा जातीच्या आधारावर ते भेदभाव करत नाहीत. आपल्यासारख्या ग्रामीण भागात ही समस्या खूप प्रचलित आहे परंतु आमच्या प्रिय प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही.

आमच्या शाळेचा निकाल नेहमीच उत्तम असतो, मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के यश प्राप्त केले

आमची एक विद्यार्थीनी दीपिका जिल्हा टॉपर आणि संस्कृतमध्ये राज्यात अव्वल आली. याचे सर्व श्रेय आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि प्रिन्सिपल सरांना जाते . माझी शाळा जरी ग्रामीण भागातील असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत . गेल्या आठवड्यात प्रिन्सिपल सर यांनी सांगितले की, या वर्षापासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणकीकृत प्रणालीवर घेतले जातील, शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर्स देखील खरेदी केले आहेत. पालकांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे, त्यांनी असे केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते, पालक हे जाणून खूष आहेत की त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. आम्हाला जिल्हास्तरावर “स्कूल ऑफ दी इयर” पुरस्कारही मिळाला. आमच्या टेक-प्रेमी प्रिन्सिपल आणि एस.एस.सी च्या यशामुळे आम्ही हा पुरस्कार जिंकला आहे.

मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे. मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, आणि आमचे भविष्य सुंदर बनवण्यात मदत करत राहील


🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫🏤🏫


माझी शाळा निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे माझी शाळा मराठी निबंध mazi shala in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


धन्यवाद !


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi || सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी

सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi || सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी

About savitribai fule
Savitribai fule information in Marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! सावित्रीबाई फुले निबंध  School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये savitribai fule information in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.

शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये सावित्रीबाई फुले निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी savitribai fule information in marathi Or savitri bai fule mahiti हे मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया सावित्रीबाई फुले निबंध कडे.

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi सावित्रीबाई फुले माहिती मराठी


    सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ – मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
                 सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्‍या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्‍या नागाला त्यांनी ठेचून मारले.
                  फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
                 सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.
                ‘त्यांनी करेल ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’…. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
              १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की “गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील”. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
               १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
                सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
                शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्‍या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
               ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
                केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
                इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
                इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगाच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

सावित्रीबाई फुले निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे savitribai fule information in marathi or savitribai fule in marathi nibandh आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी diwali eassy in marathi || maza avadta san essay in marathi

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी diwali eassy in marathi || maza avadta san essay in marathi

Diwali essay in Marathi
Maza avadta San diwali

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझा आवडता सण दिवाळी निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये दिवाळी निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून diwali eassy in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये दिवाळीची माहिती उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी diwali information in marathi कडे.

🌝🎆💥💣🌝🎆💥💣🎆💥🌝


माझा आवडता सन दिवाळी || diwali eassy in marathi || maza avadta san


अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात. त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते.

 सहामाही परीक्षा झाल्यानंतर आम्हाला दिवाळीची सुट्टी असते. परीक्षेच्याआधी जेव्हा शिपाईकाका वेळापत्रक आणतात तेव्हा आम्ही सर्वच मित्र-मैत्रिणी परीक्षेचे वेळापत्रक पाहताना परीक्षा कधी आहे हे पाहण्याआधी दिवाळीची सुट्टी कधी आहे हे पाहतो. सहामाही परीक्षा झाल्यांनतर मोठ्या उत्साहाने आम्ही सर्वजण दिवाळीच्या तयारीला लागतो. मी घरातील साफसफाई करण्यात आईला मदत करते. त्यानंतर दिवाळीच्या ४-५ दिवस अगोदर सर्व फराळ बनवण्यास मदत करते. आम्ही दोघी मिळून सर्व फराळ बनवतो कारण सर्व नातेवाइकांना फराळ द्यायचा असतो. तसेच दिवाळीच्या अगोदर आम्ही आमच्या सोसायटीच्या परिसरात सर्व मित्र-मैत्रिणी मिळून किल्ला बनवतो. आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतो. त्या किल्ल्यावर आम्ही धान्यसुद्धा पेरतो त्यामुळे दिवाळीपर्यंत किल्ला खूप मस्त दिसतो कारण पूर्ण गावात उगवलेले असते.

 किल्ल्यावर आम्ही वेगवेगळी चित्रे मांडतो. त्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी आसन तयार करतो त्यावर दरवर्षी शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवतो. किल्ल्याच्या आजूबाजूला गुहा,विहीर तयार करतो. किल्ल्याचे दरवाजे आणि तटरक्षक भिंती तयार करतो. खूप मजा येते किल्ला बनविताना. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आम्ही भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठतो. दररोज आई आम्हाला सर्वांना उटणे लावून अंघोळ घालते. नंतर दिवाळीसाठी घेतलेले नवीन कपडे घालून आम्ही फटाके उडविण्यासाठी जातो. सर्व मित्र-मैत्रिणी नवीन नवीन कपडे घालून मस्त आवरून आलेले असतात आम्ही खूप धमाल मस्ती करतो आणि सायंकाळीसुद्धा आम्ही खूप फटाके वाजवतो. त्यानंतर सायंकाळी एकत्र बसून आम्ही फराळाचा आस्वाद घेतो.

 दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवशी धने आणि गुळाच्या प्रसादाला खूप महत्व आहे. या दिवशी पूजेसाठी घरातील धन,दागिने आणि धने अशा वस्तू पूजेसाठी ठेवल्या जातात. त्यानंतर येते ती नरकचतुर्दशी या दिवशी सर्व लहान मुले लवकर उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करून नवीन कपडे घालतात आणि सर्वजण मिळून फटाके वाजवतात. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा आहे. श्रीकृष्णांनी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीखान्यातल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस दुष्ट नरकासुराचा वध करून आनंद साजरा करण्याचा.

 या दिवशी भारतात अनेक ठिकाणी नरकासुराचा पुतळा जाळतात,फटाकेसुद्धा वाजवतात आणि उत्साह साजरा करतात. नरकचतुर्दशीनंतर येते ते लक्ष्मीपूजन यादिवशी आम्ही घरी पुरणपोळी बनवतो. देवाला पुरणपोळीचा आणि फराळाचा नैवेद्य दाखवतो. यादिवशी आरोग्यलक्ष्मी(केरसुणी) हिची पूजा खूप महत्वाची असते. तसेच यादिवशी पूजेमध्ये लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती,दागिने,सोने-नाणे,पैसे,धने अशा सर्व वस्तू पूजेमध्ये ठेवतात. देवीची पूजा आई मनोभावे मांडते आणि तिची पूजा करते. ११ किंवा २१ पणत्या एका ताटामध्ये लावून देवीसमोर ठेवते. मग आम्ही सर्वजण मिळून पूजा आरती करतो. मनोभावे नमस्कार करतो. मग मी देवीला पुरणपोळी आणि फराळाचा नैवेद्य दाखवते. मग आम्ही पूजा झाल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी मिळून खूप फटाके वाजवतो.

 लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. ह्या दिवशी अनेक नवीन प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी बरेच लोक सोने खरेदी करतात,तर कोणी नवीन घर घेत,कोणी नवीन वस्तू खरेदी करत. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला भेट म्हणून एखादी वस्तू,दागिना किंवा साडी भेट देतो. त्यानंतर येते ती भाऊबीज. भाऊबीजेचा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावांसाठी दिव्यांची आरास करतात आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करतात. ओवाळून झाल्यानंतर आपल्या भावाला नारळ आणि करदोरा देतात. अशी ही दिवाळी पाच दिवसांची असते. दिवाळी कधी संपते ते उत्साहाच्या भरात कळतही नाही.

 आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या प्रदूषणामुळे बरेच लोक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करतात.तसेच शाळा आणि काही सामाजिक संस्थासुद्धा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संदेश देतात. आपला देश हे आपले घर किंवा आपला परिसर समजून आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर फटाके कमी आवाजाचे वाजवले पाहिजेत आणि फटाक्यांचा वापर कमीत कमी करून दिवाळी साजरा केली पाहिजे. तरच ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखता येईल. आणि आपल्या सर्वांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करता येईल.

🌝🎆💥💣🌝🎆💥💣🎆💥🌝

माझा आवडता सण दिवाळी निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे diwali eassy in marathi or diwali information in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Diwali eassy in marathi दिवाळी निबंध मराठी diwali information in marathi || diwali eassy in marathi

Diwali eassy in marathi दिवाळी निबंध मराठी diwali information in marathi || diwali eassy in marathi

Diwali Nibandh
Diwali essay in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! Diwali eassy in marathi करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये दिवाळी निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून diwali information in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये दिवाळीची माहिती उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी Diwali eassy in marathi कडे.

💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥


माझा आवडता सन दिवाळी || diwali eassy in marathi || diwali chi mahiti


                     
दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.

कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥

Diwali eassy in marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे दिवाळी निबंध मराठी or diwali information in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




Maza avadta rutu माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध || Marathi Nibandh

Maza avadta rutu माझा आवडता ऋतू  पावसाळा निबंध || Marathi Nibandh

Pavsala Nibandh
Maza avadata rutu

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Maza avadta rutu करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये माझा आवडता ऋतू : पावसाळा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Maza avadta rutu विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आज essay in marathi on rainy season आपल्याला उपलब्ध करून देत आहोत.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये पावसाळा निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Maza avadta rutu पावसाळा निबंध कडे.

⛈️🌤️🌕⛅🌕⛅⛈️🌕⛅⛈️🌕⛅


maza avadta rutu पावसाळा निबंध || essay in marathi on rainy season


 पृथ्वीवरती विविध ऋतू आहेत, जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगारीच म्हणावी लागेल. या बदलत्या ऋतूंमुळेच पृथ्वीवरती सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली. भुतळ,वारा, पाणी, दबाव, चंद्र, सूर्य मिळून हा ऋतूंचा अजब आणि अनोखा खेळ मांडतात, ते सुद्धा दरवर्षी, न चुकता.

                  तसे सर्वच ऋतू महत्वाचे आहेत अगदी ग्रीष्म ऋतू पासून वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर सगळेच पण मला आवडतो तो पावसाळा किंवा वर्षा ऋतू. तसा सर्वाना हिवाळा जास्त आवडतो, मला हि आवडतो पण पावसाळ्याची गोष्टच वेगळी आहे.

                     जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी मे च्या शेवटच्या आठवड्यात आभाळ दाटू लागते, वारा सुटतो, आणि पावसाची पहिली सर पडते. मातीचा सुटलेला वास, वातावरणात अचानक पसरलेला गारवा वेगळाच आनंद देऊन जातो. या क्षणांची जादू काही अशी असते कि भरपूर कवी, लेखकांना प्रेरणा देते. पावसाच्या या पहिल्या सरीचे अनुभव त्यांनी आपल्या शब्दामध्ये कैद करून ठेवले आहेत. माझा आवडता कवी “सौमित्र” म्हणजेच किशोर कदम यांची एक कविता मला खूप आवडते,उन्ह जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं.भर उन्हात पाऊस घेउन आभाळ मनात दाटतं,तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही.घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही.तितक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
 वारा उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडावरती छ्परावरती चढून पाहतोदुपार टळुन संध्याकाळ्चा सुरु होतो पुन्हा खेळ उन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो पावसाआधी ढगांमधे कुठून गारवा येतो

                  पावसाळा फक्त कवीमन प्रसन्न करत नाही तर धरतीला सुद्धा तृप्त करतो, म्हणून मला पावसाळा ऋतू आवडतो. उन्हाने होरपळलेली धरती, झाडे, झुडपे आभाळातून पडलेले अमृत पिऊन खूष होतात. पाऊस आपले ओढे, नाले, नद्या पाण्याने भरतो; आपली पिके पिकवतो. जमिनीत मुरलेले हे पावसाचे पाणी मग झरे, विहिरी, बोअरवेल च्या रूपाने बाहेर येते आणि वर्ष भर आपली तहान भागवते.

                   भारत अजूनही एक शेती प्रधान देश आहे, भारतातील ६७% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने शेतीवर अवलंबून आहेत. हि शेती मोठ्या प्रमाणात मान्सून हंगामावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. हा पावसाळा लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो, त्यांचे पोट भरतो, आणि म्हणून मला पावसाळा आवडतो. आपल्या भारतामध्ये पावसाला देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची पूजा, अर्चना सुद्धा केली जाते.

**********************************


माझा आवडता ऋतू हिवाळा || maza avadta rutu Marathi Nibandh


                  हिवाळा म्हणजे, गवताच्या पातीवर सावरलेलं दव, सोनेरी किरणांनी नटलेली सकाळ, अंगणात खेळणारी थंडी. हिवाळा म्हणजे स्वेटरची शोधा-शोध, पहाटेचे धुके आणि गरम गरम चहा भजी. हिवाळा माझा आवडता ऋतू आहे. हिवाळ्यात सर्व वातावरण प्रसन्न असते, दिवसाचे उन्ह हि हवेहवेसे वाटते. थंड वातावरणामुळे दमछाक होत नाही, दिवसभर ताजे तवाने वाटते. मला हिवाळा ऋतू आवडतो कारण यात उन्हाळ्याचा घाम नाही आणि पावसाचा चिखल हि नाही.

                  हिवाळ्याच्या अश्या आल्हाददायक वातावरणामुळे खूप लोक कुटुंबियांसोबत सहली काढतात. शाळेची वार्षिक सहल सुद्धा याच ऋतू मध्ये काढली जाते. हिवाळ्यातील प्रवास आपल्याला दमवत नाही या उलट पावसाने रंगवलेले हिरवेगार डोंगर, पर्वत, दऱ्या निखळ पाण्याने वाहणाऱ्या नद्या सारा प्रवास एक सुखद अनुभव बनवतात.

                   हिवाळ्याच्या थंड रात्री पांघरुणात शिरून झोपही छान लागते, सकाळी उठावेसे वाटत नाही. पण पहाटेच्या धुक्यात फिरण्याची एक वेगळीच मजा असते, अगदी ढगांमध्ये चालल्यासारखे वाटते. गुलाबी थंडी, धुके, सर्वत्र प्रसन्न वातावरण, हिवाळ्यातले दसरा, दिवाळी, क्रिसमस सारखे सण या सर्वांमुळे मला हिवाळा ऋतू खूप आवडतो.

⛈️🌤️🌕⛅🌕⛅⛈️🌕⛅⛈️🌕⛅

Maza avadta rutu निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे माझा आवडता ऋतू  पावसाळा  व माझा आवडता ऋतू हिवाळा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi || सावित्रीबाई फुले माहिती Marathi Nibandh

सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi || सावित्रीबाई फुले माहिती Marathi Nibandh

Savitribai fule information in Marathi
Savitribai information in Marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! सावित्रीबाई फुले निबंध  School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये savitribai fule information in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये सावित्रीबाई फुले निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी savitribai fule information in marathi Or savitri bai fule mahiti हे मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया सावित्रीबाई फुले निबंध कडे.

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼


सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi


एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल '  एवढेच स्थान होते,  स्त्रीला  समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.  पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ. सवी. सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

 सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली.  सर्व टीका,छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. जोतीबा फुले व सावित्री बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया  नरकात जातील असे त्यांचे समज होते. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही. त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता.


 संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक  छळ नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण  त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्या सारखीच वाटत. ही सर्व कृत्य त्यांना विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे.  एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,"मुलींना आणि महार - मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत  राहणार नाही" अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली.

सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या.  दादोबा  पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेकशक असतांना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती.  स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे स्त्रियांचे दुख त्यांनी जवळून पहिले होते. केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा बोलावली.  आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला.

 सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले. बाल-विधवांचे दुखः त्यांनी जाणले होते, स्त्रीभ्रूण हत्याही सर्रास घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले.  अस्पृश्यांसाठी जोतिबांनी सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले.  इ. स. १८९३ साली सत्यशोधक  समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. त्यात त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. १० मार्च १८९७ रोजी पुण्यात प्लेगची साथ आली होती. दुर्दैवाने त्यांना प्लेगने घेरले आणि त्यातच या क्रांतिकारक  महिलेने जगाचा निरोप घेतला.

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

सावित्रीबाई फुले निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे savitribai fule information in marathi or सावित्रीबाई फुले यांची माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Lokmanya tilak information in marathi || लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध bal gangadhar tilak information

Lokmanya tilak information in marathi लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध bal gangadhar tilak information

Lokmanya tilak information in Marathi
Lokmanya tilak information in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! lokmanya tilak information in marathi करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून bal gangadhar tilak information विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.
       मित्रांनो,या पोस्टमध्ये lokmanya tilak information उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया लोकमान्य टिळक माहिती निबंध कडे.

👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳

लोकमान्य टिळक माहिती मराठी || about bal gangadhar tilak || lokmanya tilak information

                         [No.1]

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३, इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.बालपण टिळकांचा जन्म जुलै २३ इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला.
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. इ.स. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्‍ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि जानेवारी २ इ.स. १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपूर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर इ.स. १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.
१८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतक-यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतक-यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, असे डी.व्ही. ताम्हणकरांसारख्या काही लेखकांचे मत आहे.
यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. .या खटल्याची सुरुवात सप्टेंबर ८ , इ.स. १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली.

bal gangadhar tilak information in Marathi लाल-बाल-पाल  माहिती

👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳

लाला लाजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बंकीमचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिपुटीला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा होमरूल ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच टिळकांचे ध्येय होते.

bal gangadhar tilakl माहिती मराठी निबंध


                              [No.2]

                बाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडीलोपार्जीत शेती सांभाळत राहात होते पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हां त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली संस्कृत आणि गणित या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक यांचा २३ जुलै १८५६ मध्ये जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव पार्वतीबाई होते. मुळनाव केशव ठेवले होते. तरी सर्वजण बाळ असेच म्हणत.तेच नाव पुढे कायम झाले. कुशाग्र बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती असल्याने बाळला गंगाधरपंतांनी संस्कृत आणि गणित या विषयांत तरबेज केले. बाळने हि हे विषय आवडीने अभ्यासले. यातूनच संस्कृत ग्रंथाचे वाचन करणे,अवघड गणिते सहजपणे सोडविणे याचा बाळला नादच लागला.
               प्राथमिक शिक्षणा नंतर बाळ पुण्यात आले. आपल्या हुश्यारीने बाळने येथील शिक्षकांचे प्रेम संपादन केले. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात सत्यप्रीयता,स्पष्टवक्तेपणा आणि अन्याअयाचा प्रतिकार करण्याची वृत्ती प्रकट होत होती. १८७२ मध्ये दहावी उतीर्ण झाल्यावर डेक्कन कॉलेजां तून त्यांनी १८७६ मध्ये बी.ए. हि पदवी परीक्षा उतीर्ण केली. १८७९ मध्ये ते एल.एल.बी.झाले. डेक्कन कोलेजात असताना त्यांचा विष्णूशास्त्री चिपळुनकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. ते तिघेही देशभक्त आणि स्वातंत्र्यप्रेमी होते.त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणार्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्रेम निर्माण केले पाहिजे.या वर तिघांचे एकमत झाले. अगदी बालपणापासूनच मुलांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण केले पाहिजे असे ठरवून त्यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
                 बाळ लोकमान्य टिळकांनी तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आणि गोपाळराव आगरकरांनी सरकारी नोकरी आणि मोठा पगार यानकडे न वळता शिक्षकी पेशा स्वीकारला. या शिक्षकी पेशात टिळकांच्या संस्कृत आणि गणित या विषयांतील आवडीचा चांगला उपयोग झाला. या तिनहि देश भक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थ्यापुरते शिक्षकाचे काम मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोचवावे. म्हणून त्यांनी ‘ केसरी ‘व ‘मराठा’ हि वृत्त पत्रे सुरु केली. लोकांच्या मनात या वृत्त पत्रांतील लेखनाने स्वदेशा विषयीची निष्ठा वाढवावी, व परकियांच्या सत्तेतून मुक्तता व्हावी, भारतीयांवर होणार्या अन्यायाला वाचा फुटावी ; असा त्या वृत्तपत्रा मागील हेतू होता.
                ‘केसरी’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणार्या लेखनात १८८२ मध्ये एकदा कोल्हापूर संस्थानातील अन्यायाला वाचा फोडणारा मजकूर प्रसिद्ध झाला. आणि त्यावरून प्रकरण चिघळले.त्यांच्यावर खटला झाला. टिळक, आगरकरांना १०१ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगाच्या बाहेर पडल्यावर टिळक-आगरकरांच्या पुढाकाराने १८८५ साली पुण्यात ‘फर्ग्युसन’ कॉलेज सुरु झाले. तिथे हे दोघे प्राध्यापकाचे काम करू लागले. त्यावेळीही त्यांचे वृत्तपत्राचे काम चालूच होते.पुढे टिळकांचे कॉलेजमधील सहकार्यांशी मतभेद झाले.आणि टिळकांनी केसरी पत्र स्वत:चालविण्यास घेऊन कोलेज्शी असलेला सम्बंध तोडला. नंतर टिळक स्वतंत्रपणे, सामाजिक व राजकीय विषयांवरची आपली मते प्रभावीपणे मांडू लागले. टिळकांच्या निर्भीड, उग्र, सत्य लेखनाने ‘केसरी’ लोकप्रिय होऊ लागला.
               ‘केसरी’ मधील लेख वाचून लोकांच्या मनात ब्रिटीश राजवटी बद्दलचां असंतोष वाढू लागला. सरकारला ‘ केसरी’ आणि टिळक यांचा धाक निर्माण  होऊ लागला.
                १८९६ — ९७ मध्ये पुण्यात प्लेगने थैमान घातले. त्या पेक्षाही इंग्रज सरकारच्या अधिकारांनी यावेळी केलेल्या अन्यायांनी कळस गाठला. त्याचा अखेर शेवटी एका इंग्रज अधिकार्याच्या खुनात झाला. या सर्व प्रकारांबद्दल टिळकांनी जे लेखन केले त्याचे निमित्त करून सरकारने संधी साधली. आणि टिळकांना तुरुंगवासात पाठविले. या सरकारच्या कृतीचा परिणाम उलटा होवून टिळकांना अधिकच लोकप्रीयता मिळाली. टिळक ‘लोकमान्य’ नेता झाले. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे” आणि “तो मी मिळविणारच, अशी त्यांची धारणा होती.
                लोकमान्य हे ब्रिटीश सरकारबद्दल लकांच्या मनात असंतोष निर्माण करणारे नेते म्हणून एकीकडे कार्य करीत होते; त्याच वेळी त्यांचा आवडत्या विषयांचा अभ्यासही सुरूच होता.त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर,सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर ‘केसरी’ तून लेखन करतानाही “आर्यांचे वस्तीस्थान” ओरायन” “शास्त्रीय पंचांग” “गीतारहस्य”  असे ग्रंथ लिहून आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. समाजातल्या सर्वांना एकत्रित आणून व्याख्यांनान द्वारे मतप्रचार करण्यासाठी त्यांनी ” गणेशोत्सव ” श्री शिवछत्रपतींच्या जयंतीचा उत्सव असे नवे उपक्रम सुरु केले.
                 लोकमान्यांची लोकप्रीयता वाढतच हती. राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचा उल्लेख होत होता, त्यामुळे सरकार बेचैन होत होते.टिळकांना लोकांपासून दूर ठेवण्याची संधी सरकार शोधत असायचे.लोकमान्य अत्यंत कडक शब्दात सरकारी धोरणांवर निर्भीडपणे टीका करीत असत. १२ मे १९०८ च्या ‘ केसरीत’ त्यांनी लिहिलेल्या ‘ देशाचे दूर्दैव ‘ या लेखाबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठविण्यात आले. पण तरीही टिळकांनी तेथेही चिंता न करता, शांत मनाने  ‘गीतारहस्य’ सारखा मोठा ग्रंथ लिहिण्याचे धाडस केले. या काळातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पण टिळकांनी ते दु:ख हि शांतपणे पचविले. भारतीयांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध  नेहमीच असंतोष निर्माण करीत असत त्यामुळे त्यांना  ‘ असंतोषाचे जनक’ असे संबोधण्यात येत असे. या त्यांच्या अनेक कार्यांनी त्यांनी सरकारला कधी लेखणीद्वारे तर कधी व्याख्यानातून हादरवून सोडलेले होते. पण नंतर  लोकमान्य १ ऑगष्ट १९२० मध्ये ते निधन पावले.  त्यांना आपणा सर्वभारतीयांचा कोटी कोटी प्रणाम !

👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳

lokmanya tilak information in marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध or bal gangadhar tilak information आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




आई संपावर गेली तर निबंध मराठी majhi aai nibandh || my mother essay in marathi

आई संपावर गेली तर निबंध मराठी majhi aai nibandh || my mother essay in marathi

Majhi aai Nibandh
Majhi aai Nibandh

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! आई संपावर गेली तर निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये majhi aai nibandh हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून my mother essay in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये majhi aai nibandh in marathi मध्ये उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी आई निबंध कडे.

👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦


माझी आई निबंध ,आई संपावर गेली तर निबंध  || mazi aai essay in marathi


 कुटुंबासाठी जेवण करणे, भांडी घासणे, कपडे धुणे, ही सगळी काम आईचीच आहेत, नाही का? त्यात मोठं असे काय करते ती. हि तिची जबाबदारीच आहे ना. मी नव्हतं सांगितलं तिला जन्म द्यायला, हि आपली नेहमीची कारणे, नाही का?.

                  आपण तिच्या कामाची, मेहनतीची, काळजीची, प्रेमाची कधीही प्रशंसा तर सोडा साधी दखल हि घेत नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला खूप प्रमाणात मिळाली, कमी मेहनतीमध्ये मिळाली, तर आपण तिची किंमत करत नाही. मग ते अन्न असू देत, पैसा असू दे, किंवा आईचे प्रेम. एकदा डोळे बंद करून कल्पना करा की आई जर खरोखरच संपावर गेली तर, जर तिने घरचे काम करणे सोडले, जेवण बनवणे थांबवले, आणि जर तिचे प्रेम गोठले, तर काय होईल? जर आई संपावर गेली तर आपल्या आयुष्यात काय बदल होतील, ते सुखद असतील की दुःखद?

                  सगळ्यात पहिली गोष्ट जी डोळ्यासमोर येते ती म्हणजे आईची कटकट थांबेल. हे आण, ते दे, इथूनच उठ, तिथे बस, हे घालू नको, वेळेत घरी ये, हे सगळे थांबेल. रात्री-बेरात्री मित्रांसोबत टवाळक्या करताना आईचा सारखा सारखा फोन येणार नाही; विचार करूनच किती मस्त वाटते.

                  सकाळी ती उठवायला येणार नाही, ब्रश करायला लावणार नाही. आपण स्वताच स्वतःसाठी पाणी गरम करून वेळेवर आंघोळ करून नाश्ता बनवू. टिफिन भरू, दप्तरामध्ये सगळी वह्या-पुस्तके व्यवस्थित भरून स्वतःच वेळेमध्ये स्कूलबस साठी जाऊ.

                    शाळेत शिक्षक-पालक मीटिंगसाठी बाबा वेळ काढून येतीलच, आईची गरज काय आहे. संध्याकाळी घरी आल्यावर आपली भांडी घासावी लागतील, दुसऱ्या दिवशीचे कपडे धुवून, इस्त्री करून घ्यावे लागतील. कपडे वॉशिंग मशीन मधून काढून सुकत घालावे लागतील, सुकून झाल्यावर ते घडी घालून ठेवावे लागतील. संध्याकाळची भूक लागल्यावर इडली, डोसा, थालीपीठाच्या जागी रोज झटपट होणारी मॅग्गी खावी लागणार.

                   कधी सर्दी खोकला झाला तर स्वतःच्याच हाताने विक्स लावावे लागेल, स्वतः दवाखान्यात जावे लागेल. नेहमी लागणार्‍या गोळ्या, फर्स्ट एड किट, आयुर्वेदिक औषधे आणून ठेवावी लागतील.

                 आणखी खूप काही आहे; हे तर आई करते त्याच्या ५% सुद्धा ही नाही. जर आई खरोखरच संपावर गेली आयुष्य थांबेल, कुठलेही काम वेळेत होणार नाही. आपल्याला आईविना जगण्याची सवयच नसते. तिच्या शिवाय आयुष्य कसे चालते हे आपल्याला माहितीच नसते. ज्या मुलांना आई नसते त्यांना विचारा आई नसणं काय असत. आई नसते तेव्हा बाबांना आई व्हावं लागत पण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या रूपात आई असणं गरजेचं असतंच.

                  आपण, आजकालची पिढी आईवडलांना, त्यांच्या प्रेमाला, काळजीला गृहीत धरतो; कधीकधी तर आपल्याला त्याचा त्रासही होतो. त्यांचा कधी कधी होणारा रागवा, चिडचिड आपल्या लक्षात राहते पण त्यामागची काळजी कळत नाही. आई खरोखरच संपावर गेली पाहिजे नाहीतर आपल्याला तिची किंमत कधीच करणार नाही.

👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦

माझी आई निबंध संग्रह मधील आई संपावर गेली तर निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे majhi aai nibandh or my mother essay in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




सूर्य उगवला नाही तर निबंध || surya chi mahiti Marathi Nibandh || sun information in marathi

सूर्य उगवला नाही तर निबंध || surya chi mahiti Marathi Nibandh || sun information in marathi

Sun information in Marathi
Sun information in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! सूर्य उगवला नाही तर निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये surya chi mahiti Marathi Nibandh हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून sun information in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये 2 निबंध surya chi mahiti वर उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी sun information in marathi कडे.

🌕🌖🌔🌕🌖🌖🌗🌓🌔🌕🌗🌕


सूर्य उगवला नाही तर निबंध || surya chi mahiti Marathi Nibandh || Essay on Sun in Marathi


                        [No.1]

सूर्याचे एक नाव आहे 'दिनमणी'. दिन म्हणजे दिवस. मणी हा शब्द तेजोगोल ह्या अर्थाने वापरला आहे. दिवसा सार्या सृष्टीला दृष्यमान करणारा, 'तम निशेचा' संपविणारा, आणि सार्या चराचरांना ऊर्जेचा अविरत पुरवठा करणारा तो 'तेजोनिधी लोहगोल' आहे. सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. वातावरणातील पाणी व कर्ब-द्वि-प्राणिल यांच्या प्रकाश-संश्लेषणाद्वारे वनस्पती प्राथमिक अन्न तयार करतात. प्रकाशाचा मूळ स्त्रोत अर्थातच सूर्य. इथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, की सजीवांचा जीव-की-प्राण असलेल्या प्राणवायूचे पुनर्विमोचनही याच प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेत होत असते. अशाप्रकारे सजीवांना प्राणवायू पुरविण्याचे कामही तो सूर्यच अप्रत्यक्षरित्या करीत असतो. सजीवांना पाण्याची नितांत गरज असते. ऋतुचक्र फिरते ठेऊन सप्तसिंधूंचे पाणी सजीवांना सोपविण्याची सोयही तो सूर्यच करतो. यावरून स्पष्टपणे जाणवते ते हेच की जीवनाचे दुसरे नावच सूर्य असावे. जर सूर्य नसेल तर जीवन संभवतच नाही.

संप ही प्रतिष्ठितांविरूद्ध कष्टकर्यांनी करावयाच्या संघर्षाची एक संकल्पना आहे. रशियन राज्यक्रांतीनंतरच्या समाजवादी युगात संप, ही संकल्पना रूढ झाली. मालकांकरवी आपल्या उचित मागण्या मान्य करवून घेण्यासाठी, विहीत काम करण्यास संघटीतपणे नकार देण्याचा हा हक्क आधुनिक जगाने मान्य केला. वारंवार क्रांतीची गरज भासू नये म्हणून, असहाय्य कामगारांनी, सशक्त व्यवस्थापनाशी, संघर्ष करण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे संप.

सर्व सृष्टीची उलाढाल ज्याचे ऊर्जेविना अशक्य आहे तो सूर्य असहाय्य नाही, अशक्त तर नाहीच नाही. त्याला सृष्टीविरूद्ध संप जर करावयाचा असेल तर तेवढी सृष्टी सशक्त नाही. शिवाय आपले म्हणणे कुणी मान्य करावे ह्यासाठी सूर्य सृष्टीवर अवलंबून नाही. म्हणून 'सूर्य संपावर गेला तर.....' हे शीर्षकच विसंगत आहे. 'सूर्यावाचून जीवन' असा एक अर्थ त्यापासून काढता येईल व तशी कल्पना करता येईल. पण मग खरा प्रश्न तर हा असेल की 'सूर्यावाचून जीवन ...., किती काळ?' ह्या प्रश्नाची अनेक उत्तरे संभवतात. या शीर्षकाशी सुसंगत निबंध लिहायचा असेल, तर त्या उत्तरांचाच उहापोह करावा लागेल.

 महाभारतीय युद्धात अभिमन्यूनी रणांगणावर देह ठेवल्यानंतरचा दिवस. एक प्रहर दिवस शिल्लक असतांनाच सूर्य मावळतो. अन्यायाने अभिमन्यूचा शेवट करणार्यांना शासन करण्यास असमर्थ ठरलेला अर्जुन अग्निकाष्ठे भक्षण करण्यास सिद्ध होतो. हे असंभव दृष्य सदेह साजरे करण्यासाठी स्वत: जयद्रथ युद्धभूमीवर प्रकट होतो. आणि काय आश्चर्य, सुदर्शन चक्रापाठी अदृष्य झालेला सूर्य कृष्णलीलेने दीप्तीमान होतो. मग काय! 'हा सूर्य अन् हा जयद्रथ' असे कृष्णाने अर्जुनास सांगताच जयद्रथाचा वध होतो. अन्यायाचे परिमार्जन होते. काही काळच सूर्य अदृष्य होण्याचा हा किस्सा जगदविख्यात आहे. यात सूर्य अदृष्य होण्याचा निव्वळ आभास घडविलेला आहे. एरव्हीही सूर्याच्या अभावातच त्याच्या प्रभावाची जाणीव आपल्याला सदैव होत असते.

 चंद्राच्या पाठीमागे सूर्य दडतो तेंव्हा सूर्यग्रहण होते. काही काळच का होईना पण सूर्य (पूर्णत: किंवा भागश:) दिसेनेसा होतो. या काळात अज्ञात आकाशस्थ वस्तू, ज्या एरव्ही प्रखर सूर्यप्रकाशात दिसत नाहीत त्या दिसू शकतात. म्हणून अशा वस्तूंचा वेध घेण्याची संधी मिळते. म्हणूनच आजकाल ग्रहणांचा अभ्यास केला जातो. अशाप्रकारे काही काळ सूर्य (पूर्णत: किंवा अंशतः) दिसेनासा होण्याने खगोलशास्त्रात नवे शोध लागू शकतात.

 वैशाखवणवा संपतासंपता मौसमी वारे सिंधूसागरावरून काळ्याकुट्ट ढगांची फौज देशावर घेऊन येतात. रात्रीच काय पण दिवसाही दिसेनासे होते. भर दिवसा आकाशात सूर्य कुठे असावा हे सुद्धा सांगता येत नाही. दिवसचे दिवस, किंबहूना आठवडे-आठवडे सूर्यदर्शन होत नाही. सूर्याच्या नसण्याने काय होते त्याचे वर्णन करण्याची मुळी गरजच उरत नाही. प्रत्येकाला सूर्य कधी उगवेल याचीच भ्रांत पडलेली असते. कारण, कारण ..... . धुतलेले कपडे सुकत नाहीत. वातावरणातली वाढलेली आर्द्रता श्वसनाच्या रोगांचे भांडार उघडते, जसे की सर्दी, दमा, न्युमोनिया वगैरे वगैरे. रस्तोरस्ती तुंबलेले पाणी चिखलात रूपांतरित होत असते तर आजुबाजूची डबकी डासांच्या पैदाईशीची माहेरघरेच बनतात. माशांचे काफीले घराघरांवर आक्रमण करतात. कोकणात उडत्या पाखरांच्या पंखांनाही शेवाळं फुटावं अशी परिस्थिती असते. आणि म्हणूनच या सार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याची अतिशय निकड भासू लागते. सूर्याच्या अभावानी नरक वाटू लागणारा परिसर, मग त्याचे प्रभावानीच स्वर्गवत होऊ लागतो. सूर्य प्रकटताच रोगराई आपला पसारा आवरू लागते, डास, माशांना पुढील पर्वणीची वाट बघावी लागते. रस्ते सुकून कोरडे पडतात. धुतलेले कपडे वाळू लागतात. पिके जोमाने वर येतात. अन् सुगीचे दिवस येतात.

                    मात्र बराच काळ सूर्य नसला तर पृथ्वीवर हाहा:कार उडेल. दैनंदिन ऊर्जेची आवक थांबेल. ऊर्जेचा जमवलेला साठा हळूहळू पण निश्चित स्वरूपानी कमी होत जाईल. मौसमी वार्यांना खीळ बसेल. ऋतुचक्र थांबेल. दिनचर्या, रात्रंदिन, अहर्निश हे शब्द अर्थहीन होतील. धृवप्रदेशाप्रमाणे भलीमोठी रात्रच काय ती शिल्लक उरेल. अंतत: तिथल्या प्रमाणेच सारी सृष्टी निर्जीव व बर्फमय होईल.

हे असे जर असेल तर, सूर्य नकोसा वाटेल असे कधी होऊ शकेल काय? हो! अशाही परिस्थितीची कल्पना करता येईल. आजही असे अनेक प्रदेश आहेत जिथे उन्हाळा कमालीचा तापतो. मग कविवर्य 'अनिल' वर्णन करतात 'केळीचे सुकले बाग' अन् 'कशी करू तुज सावली, माझ्या प्रितीच्या फुला' असा त्यांना प्रश्न पडतो. कवीयत्री इंदिरा संतांना 'वर आकाशी सूर्याची भट्टी तापली, तापली' ह्या वास्तवाचे वर्णन करावे लागते. जमिनीला तडे पडतात. जो सूर्य एरव्ही सप्तसिंधुंतून आपल्यासाठी पाणी आणतो, तोच सूर्य दिन प्रतिदिन, साठलेले पाणीही आकाशात उडवून लावतो. सारी सजीव सृष्टी पाण्यावाचून तडफडू लागते. अन् मग वाटतं की नको हा सूर्याचा ताप. अशावेळी, कल्पना करा की दर दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ सूर्यानी जर वामकुक्षी घेतली तर किती बरे होईल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण सध्यातरी हे खरेच शक्य आहे. भर उन्हाळ्यात उटीला जाऊन रहा. सूर्य माथ्यावर यायचाच अवकाश की आकाश ढगांनी भरून येईल. पावसाचा शिडकावा वातावरण कमालीचे गार करेल. अन् त्यावर इंद्रधनुष्ये विखुरण्यासाठी पुन्हा सूर्य आकाशात तळपू लागेल. यावरून एक वेगळेच वास्तव उघडकीस येईल. मानवाला स्वर्ग वाटेल असे वातावरण सूर्यच र्निर्मितो. पण ते सृष्टीवर जिथे असते तिथे सारेच लोक मात्र राहू शकत नाहीत. दैव, दैव म्हणतात ते हेच तर नाही!

 स्वर्गसमकक्ष सृष्टी सजते कधी? तर ऋतुचक्र पूर्ण होतांना! हिवाळा, ऊन्हाळा, पुन्हा पावसाळा अशाप्रकारचे ऋतुचक्र पूर्ण होते तेंव्हा सुगीचे दिवस येतात. स्वच्छ कोरडी हवा, ऊबदार सूर्यप्रकाश, भरपूर पाणी व विपूल अन्नधान्य यांनी सृष्टी संपन्न असते. स्वर्ग सृष्टीवर अवतरतो. आणि हो, हा स्वर्ग साऱ्यांनाच उपभोगता येतो. म्हणूनच सूर्य संपावर गेला तर ......  काय होईल ह्या निष्फळ चिकित्सेत उगाच न गुंतता सूर्य सजीवांना धार्जिणा होतो तेंव्हा ...... म्हणजेच ऋतुचक्र पूर्ण होतांना हिवाळयात, माणसे सण अन् उत्सवांत रमून जातात. अन् हीच या शिर्षकास समर्पक साठा उत्तरांची कहाणी नव्हे काय?

🌕🌖🌔🌕🌖🌖🌗🌓🌔🌕🌗🌕


सुर्य संपावर गेला तर मराठी निबंध surya ugavala nahi tar essay in marathi


                     [ No. 2 ]

सकाळी सहा वाजण्याच्या गजराने मला गाढ झोपेतून जाग आली. माझी सकाळची शाळा असल्याने मला न राहवून उठणे भाग होते. मी डोळे किलकिले करत.. उलट्या हाताने डोळे चोळत उठून अलार्म जवळ ओढले. पक्ष्यांचा किलकिल आवाज माझ्या कानांना जाणवत होता. त्या आवाजातच आलार्मचा कर्कश आवाज मिसळत होता. मी अलार्म बंद करून टेबलवर ठेवून दिले. त्याचवेळी एक गोष्ट माझ्या अचानक लक्षात आली.

आज घर एकदम सामसुम गाढ झोपेत विराजमान होते. म्हणजे माझ्या आईची रोज पाचला होणारी सकाळ आज सहा वाजले तरी तिला उठण्याचे ध्यानच राहीले नव्हते. मग आज शाळेला सुट्टी हा विचार करून मी टुणकन बेडवर उडी मारून ब्लँकेट अंगाभोवती लपेटून झोपून घेतले. पण रोज उठण्याच्या सवयीमुळे मला आज झोपायला मिळत असूनही झोपच येत नव्हती. आज काहीतरी विचित्र घडतय असं जाणवत होतं. मला काहीतरी विस्कटल्याचा भास होत होता. मी ब्लँकेट डोळ्यापर्यंत ओढून फक्त विचार करत होतो. पण आठ वाजले तरी सुर्य उगवायचे नावच घेईना.. आई कधीचीच उठलेली पण तिला काहीच काम करावेसे वाटेना. सगळ्यांना कंटाळवाणसं झालं होतं. आज सुर्यांने सुट्टी घेतल्यासारखे वाटत होते. रोज वेळेत उगवणारा सुर्य आज अचानक गायब होऊन बसलेला.

मी धावत पळत टेरेसवर गेलो. इकडून तिकडून मान वळवून पाहिले पण सुर्य काही दिसेचना. आता मोठी पंचाईत झालेली. मग आज दिवस पाहायलाच मिळणार नाही. मला चिंकीसोबत खेळताही येणार नाही. किती निष्ठूर झालाय ना सुर्य..? असं मी स्वतःशीच बडबडत दाणदाण पाय आपटत खाली पोचलो.

आईला माझा बदललेला नुर लगेचच काय तो लक्षात आला. मला पाय आपटत खाली येताना पाहून तिने हातातले काम तसेच चालू ठेवत एक नजर माझ्याकडे पाहून मला विचारले. “काय रे… असे पाय आपटायला काय झाले?

“बघ ना आई.. तो सुर्य आहे ना… तो रोज उगवतो ना गं… आज बघ ना कुठे लपून बसलाय.. कधीचा उगवायचे नावच घेईना. आईला आधी माझ्या बोलण्याने हसूच आले. पण तिने हसू दाबत मला जवळ बोलावून घेतले. आज आमच्या घरी कांदाभज्जीचा बेत चालू होता. आई ने एक गरम गरम भज्जी माझ्या हातात देत मला म्हणले. शोन्या.. तुला असते किनई संडेला सुट्टी.. मग तो बिचारा किती काम करतो… तो दमत नसेल का रे.? मग त्याला पण दिलेली असेल कि देवाने आजची सुट्टी. आई चे उत्तर जखमेवर फुंकर मारून काही वेळासाठी जखमेला थंडावा देण्यासारखं होतं. पण माझ्या मनाला तिचे काही पटेचना.

“अरे असं कसं होऊ शकत.? सुर्य उगवलाच नाही तर माणूस जगणार कसा? त्याला सुर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन कसे मिळणार? अशाने झाडेसुध्दा उन्मळून पडतील.. सारं जग कसं ओसाड पडेल.. कुणी जगणारच नाही. जीवन जगण्या जितकं अन्नपाण्याची गरज आहे तितकच प्रकाषाचीही आहेच. मग सारं जग अंधारमय झालं तर?

मी असा विचार केला आणि माझ्या डोळ्यात पाण्याचे मोठे मोठे ढग उभे राहीले. एक थेंब टपकन पायाच्या अंगठ्यावर पडला. दुसरा मी गालावरच पुसून टाकला. मनान अस्वस्थता घेतली होती. इतुका जीव माझा आता मोठ्या मोठ्या विचारांत गढला होता. मी देवघरात धाव घेतली. देवाला सांगितल कि आजची सुर्याची सुट्टी कॅन्सल करून टाक… पण बिचारा खूप दमला असेल ना रे तो? मग तु दोन सुर्य का ठेवत नाहीस? माझी आई म्हणते कि बाबांची एकच शिफ्ट असते… बाबा दमतात म्हणून मग त्यांच्या जागेवर दुसय्रा शिफ्टला दुसरा माणूस असतो.. तु पण देवा.. दुसरा सुर्य ठेव ना… म्हणजे एका सुर्याला आराम करायला मिळेल. पण देवा आज सुर्याची सुट्टी कॅन्सल कर रे. आज संडेसुध्दा नाहीये.. मला स्कुल ला जायचय… आई बाबांना जॉब ला जायचय. सुर्य न उगवण्याने लोकं कंटाळवाणी बनलेयत..

शहरातल्या लोकांच एकवेळ ठिक आहे रे.. पण ज्या गावात अजून विजेचा पुरवठा झालेला नाही. त्या गावातल्या लोकांच सर्व काम कसं सुर्याच्या प्रकाषात चालत. मग सुर्य आज संपावर गेला तर त्यांचा आजचा सर्व दिवस खोळंबा होईल रे. त्यांच्यातली लोकं डोळे ताणून फक्त तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहात असतील. तुच जर असा अन्याय केलास तर त्यांच काय होईल रे. इतका निष्ठूर नको बनूस देवा… कृपा करून आज सुर्याला पाठवून दे.. मी देव्हाय्रात बसून कित्येक वेळ देवाला विनवत बसलेलो. मग काही वेळाने पुन्हा सुर्याच्या येण्याची काही चिन्हे दिसतात का ते पाहायला बाहेर आलो. पण तसे काही घडलेच नाही. दुरदुरपर्यंत सुर्याचे काही चित्रच दिसत नव्हते.

निराशेने मी माझ्या खोलीत परतलो. दाणकन बेडवर उडी मारली. पण मी बेडवर नाही तर जमिनीवर जाऊन आदळलो. कंबरेत जोराची विज सणकून गेली. डोळे चोळत मी उभा राहीलो. बाहेर पाहीलं तर सुर्य केव्हाचाच उगवलेला.. म्हणजे मला ते सुर्य संपावर गेल्याच स्वप्न पडलेलं. मी आनंदान उडी मारली. कॅलेंडरकडे नजर गेली… “अरे आज तर शाळेला सुट्टी… मी परत आनंदाने बेडवर लोळत पडलो… पण ते स्वप्न मला पुन्हा तसेच आठवू लागले…. खरचं सुर्य संपावर गेला तर….???

🌕🌖🌔🌕🌖🌖🌗🌓🌔🌕🌗🌕

सूर्य उगवला नाही तर निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे surya chi mahiti Marathi Nibandh or sun information in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏