माझी आई निबंध मराठी majhi aai nibandh || my mother essay in marathi

माझी आई निबंध मराठी majhi aai nibandh || my mother essay in marathi

Mazi aai Nibandh
Majhi aai Nibandh

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझी आई निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये majhi aai nibandh हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून my mother essay in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.

शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये 2 majhi aai nibandh in marathi मध्ये उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी आई निबंध कडे.

👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦

माझी आई निबंध मराठी majhi aai nibandh || mazi aai essay in marathi


                        [No.1]

आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे. एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये. जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे. लहानपणापासून आंजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते. आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही होते. रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते. कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.

माझी आई सुद्धा अशीच सामन्य पण तरीही असामान्य आहे. लहानपणापासून बघितले तिला दिवस-रात्र घरात कष्ट करताना. पहाटे सर्वात आधी उठून स्वयंपाक घरात खुडबुड करणाऱ्या आईमुळे झोपमोड होते पण जेव्हा बिछान्यातून बाहेर येऊन ब्रश केल्यावर लगेचच समोर गरमागरम नाश्ता आणि वाफाळलेला चहाचा कप येतो तेव्हा उरल्यासुरल्या सुस्ती सोबतच चिडचिडेपणा निघून जातो. मग सुरु होते आईची धावपळ – आई अंघोळीसाठी पाणी काढ ना, आई माझे कपडे कुठे आहेत, डबा भरला का? मला नाही आवडत हि भाजी, बेसनची पोळी दे काढून. किती किती ऑर्डर्स एका पाठोपाठ एक. पण कधीही त्रागा न करता आई सर्व फर्माईशी पूर्ण करत असते. या मध्ये बाबांचे आणि आजीचे आदेश तर वेगळे असतातच. कुठून आणते आई एवढा सगळा उत्साह आणि शक्ती देव जाणे. मला तर सकाळी उठून शाळेत जायचे म्हटले तरी जीवावर येते. आभ्यास करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी वाटते.

एकदा आईला म्हटले सुद्धा, तुझ आयुष्य किती छान आहे, ना अभ्यासाची कटकट ना परिक्षेच टेन्शन ना रिझल्टची भीती. आई हसून बोलली तुला कोणी सांगिलत कि मला अभ्यास नसतो, दररोज सर्वांच्या आवडी निवडी प्रमाणे जेवण-नाश्ता बनविणे, तुमची सांगितलेली कामे लक्षात ठेवून करणे हे काही गृहपाठापेक्षा कमी आहे का? आणि परिक्षेच बोलाल तर माझी तर रोजच परीक्षा असते. आणि रोजच माझा रिझल्ट लागतो. माझा प्रश्नांकित चेहरा बघून हसून बोलली – आज भाजी चांगली नाही झाली, मीठ कमी आहे आमटीत, चटणी छान झाली आहे… तुम्ही सर्वजण वेळ न दवडता माझ्या कामाचे प्रगती पुस्तक देऊन मोकळे होतात.

खरच किती खरी गोष्ट आहे ना, आपण आपल्या खास मित्र-मैत्रिणींना सुद्धा इतक्या सहजपणे सांगत नाही कि ते चुकले आहेत, किंवा त्यांचं वागण बरोबर नाही, किती सावधानतेने त्यांचं मन न दुखवता त्यांच्याशी बोलतो पण आई, आईच्या मनाचा कधीच इतका खोलवर विचार करत नाही. आपल्या वागण्या बोलण्याने ती दुखावेल असा विचारही मनात येत नाही. किती गृहीत धरून चालतो आपण आईला. बाबांना राग येणार नाही याची काळजी घेतो, फ्रेंड्सना वाईट वाटणार नाही याचीहि काळजी घेतो. पण कधीही आईच्या मनाची काळजी करत नाही. कधी कधी तर इतरांचा रागही तिच्यावर काढतो पण ती एखाद्या संताप्रमाणे सारे काही सहन करते आणि वाट बघते तुमचा राग शांत होण्याची, आणि मग काहीही घडलं नसल्याप्रमाणे वागू लागते, अपेक्षा नाही करत की तुम्ही तुमची चूक कबूल कराल; तुमच्या माफी माग्ण्यापुर्वीच तुम्हाला माफ करून मोकळी झालेली असते.

माझी आई आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे याची मला कधी कल्पना हि नव्हती. किती सहजपणे आपली कर्तव्य पार पाडत आपली आवश्यकता बनून जाते. मला हे तेव्हा समजले जेव्हा एकदा माझी आई आजारी पडली. आई सोबतच संपूर्ण घर आजारी पडल्या सारखे वाटत होते. आई तापामुळे आणि डोकेदुखी मुळे हैराण झाली होती. बाबांनी तिला आराम करायला सांगितले आणि घराची जबाबदारी स्वतः उचलली. त्या दिवशी ना नाश्ता वेळेवर मिळाला ना जेवण. चवीचं तर विचारूच नका. घर आवरलं नसल्यामुळे अस्त्यावस्त पडले होते. किचनच्या सिंक मध्ये भांड्यांचा ढीग पडला होता. तीच स्थिती बाथरूमची सुद्धा झाली होती. असं वाटतच नव्हत की हे आपलं घर आहे. खूप प्रयत्न केला मी आणि बाबांनी सर्व आवरण्याचा पण कुठून सुरवात करावी आणि काय काय कराव हेच कळत नव्हत. माझी आई रोज एवढी काम करते की जी मला आणि बाबांना सुद्धा संपत नव्हती, आणि ती सुद्धा हसतमुखाने. त्यादिवशी पासून माझ्या आणि बाबांच्या मनात आई बद्दल आदर आणि प्रेम दुप्पटीने वाढले. मी तर मनापासून ठरवलं की आजपासून आईला जास्त काम सांगायची नाहीत. जेवढी जमतील तेवढी काम स्वतःच करायची. तिला तिच्या कामात सुद्धा शक्य तेवढी मदत करायची.

आईला जेव्हा संध्याकाळी थोड बर वाटलं तेव्हा उठली आणि लगेचच कामाला लागली. मी आणि बाबा होतोच मदतीला. तेव्हापासून आजपर्यंत कधीही आईला विचारल नाही कि तू दिवसभर घरी काय करत असतेस? कारण आईने न सांगताच आम्हाला कळाल की आई फक्त एक माणूसच नाही तर ती आमच्या घराचा आत्मा आहे, कणा आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे का म्हणतात हे आता मला खऱ्या अर्थाने उमगले.

👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦

माझी आई मराठी निबंध majhi aai nibandh marathi || mazi aai essay in marathi


                      [ No.2]

आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य कमी पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्‍यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले.

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्‍येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही.

ती स्वतः एम्. एस्सी.(M.Sc) असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी.(Ph.D) केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती. माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.

खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील. आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'

👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦👩‍👧‍👦👩‍👦‍👦

माझी आई निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे majhi aai nibandh or my mother essay in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




1 टिप्पणी: